शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

महापालिकेतल्या ‘तीन तिघाडी’ने कोणाची ‘बिघाडी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा याची उत्सुकता होती. पुणे महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढवली जाण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर याचा लाभ कोणाला याची चर्चा सुुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघांनी ‘आगामी महापौर आमचाच’ असा विश्वास व्यक्त केला आहे. कॉंग्रेसमध्ये मात्र मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने एकचा प्रभाग गृहीत धरून प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले होते. यामुळे सर्वच पक्षांची धास्ती वाढली होती. एक प्रभाग रचना ठेवली असती तर महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे पत्ता कापला गेला असता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुण्यात द्विसदस्यी प्रभाग पद्धतीचे सूतोवाच केले होते. सन २०१७ च्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेत पहिल्यांदाच पुण्याची महापालिका जिंकली होती. मात्र, आता ‘ना भाजपाच्या मनासारखे, ना राष्ट्रवादीच्या मना’सारखे असे झाल्याने निवडणुकीतली चुरस वाढली आहे.

कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी प्रदेश कार्यकारिणीची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. याआधीच्या भाजपा सरकारने चार सदस्यांचा प्रभाग केला. त्यात त्यांचे राजकारण साधले; मात्र शहर विकासाची वाट लागली. त्यामुळे एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी काँग्रेस सरकारला करणार आहे. कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी सांगितले, “महाआघाडी सरकारने वेळीच प्रभाग रचनेचा निर्णय घेतल्याने आभार मानतो. या निवडणुकीतही तिन्ही पक्षांची आघाडी झाली तर तिघांना एक-एक जागा मिळेल.”

चौकट

प्रभाग कितीचाही असो

“अजित पवार नेहमीच कार्यकर्त्यांना सांगतात, प्रभाग रचना कशी झाली तरी प्रत्येकाची निवडून येण्याची ताकद असली पाहिजे. त्यामुळे प्रभाग रचना एकची होवो की, दोन-तीनची; पण यावेळी पुणे महापालिकेत ‘राष्ट्रवादी’चीच सत्ता येऊन आमचाच महापौर होणार याबाबत काही शंका नाही. पुणेकरांनी भाजपचा कारभार पाहिला आहे आणि आमची तयारी पूर्ण झाली आहे. पुणेकर आम्हालाच निवडून देतील.”

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

चौकट

पुणेकरांचा विश्वास आमच्यावर

“हा निर्णय घ्यायला राज्य सरकारने उशीरच केला. सत्तेतल्या तिन्ही पक्षांत कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुण्यात प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपलाच मिळेल असा ठाम विश्वास आहे. पाच वर्षांपूर्वी पुणेकरांनी टाकलेला विश्वास मेट्रो, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे विकास आराखडा, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आदींमधून आम्ही सार्थ ठरवला आहे.”

- जगदीश मुळीक, भाजप शहराध्यक्ष

चौकट

शिवसेनेशिवाय महापौर नाही

“शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली हे खूप चांगले झाले. चारच्या प्रभाग रचनेत भाजप सोडून सर्वांची प्रचंड वाताहत झाली होती. आता तीनचा प्रभाग झाला आहे. यात कोणी कितीही दावे केले तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय महापालिकेत कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही आणि कोणाचाच महापौरही होणे कठीण आहे.”

- संजय मोरे, शिवसेना शहराध्यक्ष

चौकट

लढणारा योद्धा पाहिजे

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. राज ठाकरे नेहमीच सांगतात, मैदान कसेही असो लढणारा योद्धा पाहिजे. मनसेची पूर्ण तयारी झाली आहे. आघाडी, युतीबाबत वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय होऊ द्या, मनसे पूर्ण ताकदीने लढणार.”

-वसंत मोरे, मनसे शहराध्यक्ष