शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

वाहतूककोंडीस जबाबदार कोण?

By admin | Updated: January 14, 2017 02:43 IST

शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही.

कामशेत : शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे या कोंडीचा त्रास वाहनचालक, पादचारी, सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक आदींना होत आहे. या वाहतूककोंडीला नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. कामशेत ही मावळातील मध्यवर्ती बाजारपेठ असून नाणे, पवन, अंदर मावळासह आजूबाजूच्या सुमारे ७० गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. शहराजवळूनच जुना मुंबई-पुणे महामार्ग व लोहमार्ग असल्याने रोज हजारोच्या संख्येने नागरिक शहरात विविध कामांसाठी येत असतात. शहरात पूर्वीपासून मोठी बाजारपेठ असून अनेक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, अनेक खासगी दवाखाने, बँका, पोस्ट आॅफिस, रेल्वे स्टेशन व इतर अनेक महत्त्वाची ठिकाणे असल्याने विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी, व्यावसायिक आदींची शहरात मोठी वर्दळ असते. रस्त्यावर तासन्तास उभी राहणारी वाहने, बेशिस्त वाहनचालक, व्यापाऱ्यांची वेळी-अवेळी येणारी मालवाहतूक वाहने, हातगाडीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले, बेशिस्त पथचालक, वाहन पार्किंग सुविधेचा अभाव व इतर अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहतूक पोलिसांच्या सततच्या कारवाईनेहीही कोंडी सुटत नसून, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व नागरिकांच्या उदासीनतेमुळे वाहतूककोंडीची समस्या अवघड झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईत गरिबांच्या टपऱ्या हटवून श्रीमंतांच्या अतिक्रमणांकडे काणाडोळा केल्याचा आरोप अनेकजण करत आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढली आहेत. मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक दुकानदारांचा माल रस्त्यावर येत असून, पादचारी, तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी थोडीही जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वाहने रस्त्यावरच लावली जातात. शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली. पण, वाहने लावण्यासाठी साइडपट्ट्याच शिल्लक नसल्याने या योजनेचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उभारला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार डी. बी. खंडागळे व तीन वॉर्डन यांनी मागील एका डिसेंबर महिन्यातच ४२७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. यातून ६७,८०० रुपये दंड वसूल केला आहे. यात १३ जणांवर ड्रंक इन ड्राइव्हचे गुन्हे दाखल केले आहेत. १३ अवैध प्रवासी वाहतूक, १६९ लेनकटिंग, १०८ विनाहेल्मेट, ६ सीटबेल्ट, ३६ वाहन कागदपत्रे नसणे, ६३ ट्रिपलसीट, २ नो पार्किंग, ५ मालवाहतूक, २ विना वाहन परवाना, ९ अल्पवयीन चालक, २ रॉँग साइड, २ मोबाइलवर बोलणे, १० इतर आदी आहेत. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असूनही वाहतूककोंडीची समस्या सुटत नाही. ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या खुल्या करीत नाहीत, तोपर्यंत ही कोंडीची समस्या सोडवणे कठीण असल्याचे पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिसांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)