शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

काळदरी आरोग्य केंद्राला कोणी जागा देता का जागा?

By admin | Updated: May 10, 2017 03:55 IST

पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना सुमारे ३५ ते ४५ कि.मी. दूर जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जागेअभावी रखडले असून, या प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.काळदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. येथे प्र्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे या मागणीसाठी डोंगरी भागातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. त्यानंतर जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने शासनाने १७/१/२०१३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांत आरोग्य केंद्र कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून २ एकर समतल जागेची मागणी होत असून, डोंगर भागात सलग व सपाट २ एकर जागा उपलब्ध होणे अशक्य आहे. सद्यस्थितीला ग्रामपंचायत स्वमालकीची गावठाणाची समतल २० गुंठे जागा असून, सध्याच्या आरोग्य उपकेंद्रालगतच १४ गुंठे जागा उपलब्ध आहे. पुरंदरच्या दुर्गम डोंगरी भागातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, जागा उपलब्धतेच्या दृष्टीने तीन मजली इमारतीचा आराखडा बनवावा व त्यास तांत्रिक मान्यता घ्यावी, अशी मागणी काळदरीचे सरपंच अंकुश परखंडे यांनी केली आहे.काळदरी खोऱ्यात बहिरवाडी, घेरापुरंदर येथे अपुऱ्या सोयी, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. दुर्गम भाग असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्राचे बांधकाम होऊन रुग्णांना सेवा देणे अत्यावश्यक बनलेले आहे. दरवर्षी या डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. एखाद्याला सर्पदंश झाला की सासवडला अथवा भोरला जावे लागते. दरम्यान दोन्ही ठिकाण जास्त अंतरावर असल्याने आजअखेर सर्पदंशाने काळदरी येथील ओम ज्ञानेश्वर राऊत, स्नेहल प्रकाश यादव तसेच बहिरवाडी येथील योगेश संजय ढगारे यांना तातडीच्या उपचाराअभावी प्राण गमवावे लागले तर रेखा भंडलकर व पांडुरंग चव्हाण यांना तालुक्याच्या ठिकाणी उपचार मिळाल्याने सुदैवाने प्राण वाचले.या भागातीलच आप्पा दशरथ वाघमारे यांना बेदम मारहाण झाल्यावर उपचार वेळेत न मिळाल्याने ते गतप्राण झाले. परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात शिरवळ, किकवी, माहूर, परिंचे, सासवड आदी ठिकाणी उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. यावर अजून किती हकनाक बळी गेल्यावर तोडगा निघतो? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.