शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

काळदरी आरोग्य केंद्राला कोणी जागा देता का जागा?

By admin | Updated: May 10, 2017 03:55 IST

पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना सुमारे ३५ ते ४५ कि.मी. दूर जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जागेअभावी रखडले असून, या प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.काळदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. येथे प्र्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे या मागणीसाठी डोंगरी भागातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. त्यानंतर जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने शासनाने १७/१/२०१३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांत आरोग्य केंद्र कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून २ एकर समतल जागेची मागणी होत असून, डोंगर भागात सलग व सपाट २ एकर जागा उपलब्ध होणे अशक्य आहे. सद्यस्थितीला ग्रामपंचायत स्वमालकीची गावठाणाची समतल २० गुंठे जागा असून, सध्याच्या आरोग्य उपकेंद्रालगतच १४ गुंठे जागा उपलब्ध आहे. पुरंदरच्या दुर्गम डोंगरी भागातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, जागा उपलब्धतेच्या दृष्टीने तीन मजली इमारतीचा आराखडा बनवावा व त्यास तांत्रिक मान्यता घ्यावी, अशी मागणी काळदरीचे सरपंच अंकुश परखंडे यांनी केली आहे.काळदरी खोऱ्यात बहिरवाडी, घेरापुरंदर येथे अपुऱ्या सोयी, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. दुर्गम भाग असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्राचे बांधकाम होऊन रुग्णांना सेवा देणे अत्यावश्यक बनलेले आहे. दरवर्षी या डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. एखाद्याला सर्पदंश झाला की सासवडला अथवा भोरला जावे लागते. दरम्यान दोन्ही ठिकाण जास्त अंतरावर असल्याने आजअखेर सर्पदंशाने काळदरी येथील ओम ज्ञानेश्वर राऊत, स्नेहल प्रकाश यादव तसेच बहिरवाडी येथील योगेश संजय ढगारे यांना तातडीच्या उपचाराअभावी प्राण गमवावे लागले तर रेखा भंडलकर व पांडुरंग चव्हाण यांना तालुक्याच्या ठिकाणी उपचार मिळाल्याने सुदैवाने प्राण वाचले.या भागातीलच आप्पा दशरथ वाघमारे यांना बेदम मारहाण झाल्यावर उपचार वेळेत न मिळाल्याने ते गतप्राण झाले. परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात शिरवळ, किकवी, माहूर, परिंचे, सासवड आदी ठिकाणी उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. यावर अजून किती हकनाक बळी गेल्यावर तोडगा निघतो? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.