शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

कचरा प्रकल्प ठरताहेत पांढरा हत्ती

By admin | Updated: April 25, 2017 04:26 IST

शहरातला कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून, विविध प्रकल्प सुरू केले. शहरातील २६ प्रकल्पांची तब्बल

पुणे : शहरातला कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून, विविध प्रकल्प सुरू केले. शहरातील २६ प्रकल्पांची तब्बल २ हजार १२५ मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असता, सध्या केवळ ५३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे घन कचरा विभागाकडून मिळालेल्या माहितीमुळे उघडकीस आले आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीवर देखील कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे प्रकल्प पांढरे हत्ती ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने व येथील स्थानिक नागरिकांनी कचरा प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. फुरसुंगी येथे कचरा टाकून दिला जात नाही अन् महापालिकेचे कचरा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहेत. यामुळे शहरातील कचरा पेट्या ओसांडून वाहत असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच-सहा वर्षांत शहरात सुरू करण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर वरील वस्तुस्थिती समोर आली.फुरसुंगी ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधानंतर व न्यायालयाच्या निर्णयानंतर, सन २००७ नंतर येथे कचऱ्याचे ओपन डम्पिंग थांबविण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने येथे २००८ मध्ये सुमारे १ हजार क्षमतेचा हंजर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. तांत्रिक कारणे व अकुशल कामगार यामुळे सन २०११ मध्ये हा प्रकल्प बंद पडला. या प्रकल्पांवर केंद्र शासनाच्या वतीने तब्बल २३ ते २४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आला. फुरसुंगीच्या ग्रामस्थांकडून वारंवार आंदोलन सुरू झाल्याने उशिरा जागे झालेल्या महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली; तसेच याच वेळी पर्यायी जागेचा शोधदेखील सुरू केला. हडपसर येथे अजिंक्य टप्पा एक व टप्पा दोन असे सुमारे २०० मे.टन क्षमतेचे प्रकल्प सन २०१० मध्ये सुरू करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १५ कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले. दोन्ही प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला ३ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च केला जातो. सध्या हे प्रकल्प सुरू असले, तरी क्षमतेपेक्षा अधिक सुमारे ३०० मे.टन कचरा येथे टाकला जात असल्याने कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे समोर आले आहे.याशिवाय महापालिकेच्या वतीने स्वच्छ संस्था, अदर पूनावाला क्लिन सिटी मुव्हमेंट, मे. अर्न्स अ‍ॅन्ड यंग आदी विविध संस्थांच्या मदतीने कचऱ्याचे विलगीकरण व अन्य काम करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या सोसायट्यांना आपला कचरा जिरविण्यासाठी प्रोत्सहान देण्यात येत आहे. परंतु, याकडेदेखील अनेक सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाच्या वतीने नगरसेविक व लोकप्रतिनिधी यांंना आपल्या मतदार संघात कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आव्हान करण्यात आले. परंतु, बहुतेक सर्वच नगरसेवकांचा आपल्या प्रभागात कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध आहे. सध्या तरी कचरा प्रश्नापासून सर्वच दूर पळत असल्याचे चित्र शहरात आहे.(प्रतिनिधी)