शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

कचरा प्रकल्प ठरताहेत पांढरा हत्ती

By admin | Updated: April 25, 2017 04:26 IST

शहरातला कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून, विविध प्रकल्प सुरू केले. शहरातील २६ प्रकल्पांची तब्बल

पुणे : शहरातला कचरा शहरातच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून, विविध प्रकल्प सुरू केले. शहरातील २६ प्रकल्पांची तब्बल २ हजार १२५ मे.टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असता, सध्या केवळ ५३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे घन कचरा विभागाकडून मिळालेल्या माहितीमुळे उघडकीस आले आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीवर देखील कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे प्रकल्प पांढरे हत्ती ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्याने व येथील स्थानिक नागरिकांनी कचरा प्रश्नावर आंदोलन सुरू केल्याने, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. फुरसुंगी येथे कचरा टाकून दिला जात नाही अन् महापालिकेचे कचरा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहेत. यामुळे शहरातील कचरा पेट्या ओसांडून वाहत असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच-सहा वर्षांत शहरात सुरू करण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर वरील वस्तुस्थिती समोर आली.फुरसुंगी ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधानंतर व न्यायालयाच्या निर्णयानंतर, सन २००७ नंतर येथे कचऱ्याचे ओपन डम्पिंग थांबविण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने येथे २००८ मध्ये सुमारे १ हजार क्षमतेचा हंजर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. तांत्रिक कारणे व अकुशल कामगार यामुळे सन २०११ मध्ये हा प्रकल्प बंद पडला. या प्रकल्पांवर केंद्र शासनाच्या वतीने तब्बल २३ ते २४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आला. फुरसुंगीच्या ग्रामस्थांकडून वारंवार आंदोलन सुरू झाल्याने उशिरा जागे झालेल्या महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली; तसेच याच वेळी पर्यायी जागेचा शोधदेखील सुरू केला. हडपसर येथे अजिंक्य टप्पा एक व टप्पा दोन असे सुमारे २०० मे.टन क्षमतेचे प्रकल्प सन २०१० मध्ये सुरू करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल १५ कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले. दोन्ही प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला ३ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च केला जातो. सध्या हे प्रकल्प सुरू असले, तरी क्षमतेपेक्षा अधिक सुमारे ३०० मे.टन कचरा येथे टाकला जात असल्याने कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे समोर आले आहे.याशिवाय महापालिकेच्या वतीने स्वच्छ संस्था, अदर पूनावाला क्लिन सिटी मुव्हमेंट, मे. अर्न्स अ‍ॅन्ड यंग आदी विविध संस्थांच्या मदतीने कचऱ्याचे विलगीकरण व अन्य काम करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या सोसायट्यांना आपला कचरा जिरविण्यासाठी प्रोत्सहान देण्यात येत आहे. परंतु, याकडेदेखील अनेक सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाच्या वतीने नगरसेविक व लोकप्रतिनिधी यांंना आपल्या मतदार संघात कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आव्हान करण्यात आले. परंतु, बहुतेक सर्वच नगरसेवकांचा आपल्या प्रभागात कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध आहे. सध्या तरी कचरा प्रश्नापासून सर्वच दूर पळत असल्याचे चित्र शहरात आहे.(प्रतिनिधी)