शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

कुजबूज २८ ऑगस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झाली नव्हती. पॉझिटिव्हिटी रेट दोनच्या खाली घसरायचा होता. तोवरच ...

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झाली नव्हती. पॉझिटिव्हिटी रेट दोनच्या खाली घसरायचा होता. तोवरच व्यापारीवर्ग, आमदार व अन्य प्रमुख लोकप्रतिनिधी लॉकडाऊनचे निर्बंध खुले करण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे करत होते. त्याची आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साप्ताहिक आढावा बैठकीत काढलीच. “तुम्ही सर्व आमदार सर्व खुले करा, वेळ दहा वाजेपर्यंत वाढवा, वेळ वाढवली तरी गर्दी कमी होईल असं म्हणत होता. तरी मी, मुख्यमंत्री आम्ही सगळेच सांगत होतो थोडं दमानं घेऊ....पण नाही...आता परत रुग्णसंख्या वाढू लागलीय तर म्हणता, लसीकरण वाढवलं पाहिजे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्हीच पहा काय होते? काय चाललंय?” या शब्दांत अजित पवार यांनी त्रागा व्यक्त केला. त्यांच्या बोलण्यात थोडं तथ्य आहे. कोरोना रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. पण म्हणून घरी किती दिवस बसणार? व्यवसाय, व्यापार, छोटे-मोठे दुकानदार सगळ्यांचाच धंदा बसला आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका खूप कमी होतो असं दिसतंय. त्यामुळं आता सगळा गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेलच ना. कोरोना बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी याच अजितदादांनी बारामतीत सांगितलं, ‘कोरोना काळात राज्याच्या सरकारी तिजोरीत तब्बल दीड लाख कोटी रुपयांची तूट आली आहे.’ त्यामुळं आता अजितदादांनाच सांगावं लागेल, “निर्बंध लादण्याबाबत तुम्हीच जरा घ्या दमानं.”

------------

संरक्षणमंत्र्यांची ‘ऐतिहासिक’ चूक

इतिहासातील तपशीलांचा उल्लेख करताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषाबद्दल बोलताना कमालीचं भान पाळणं आवश्यक आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुन्हा पुण्यात शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तर अभ्यासच हवा. संरक्षणमंत्री राजनाथसिंह नुकतेच पुण्यात येऊन गेले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा उल्लेख केला. समर्थ रामदास हे संतकवी छत्रपती शिवरायांच्या बालपणात त्यांच्या सोबत असल्याचे संरक्षणमंत्र्यांच्या भाषणातून ध्वनित होत होते. वास्तवात असा दाखला इतिहासात कोठेही नाही. पूर्वी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या राजनाथसिंह यांनी इतिहासाचा उल्लेख करताना थोडी अधिक तयारी केली असती तर बरे झाले असते.

---------------------