शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

----------- भाजपचा ढोंगी आक्रोश कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळात म्हणजेच सन २०१४ पूर्वी राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री मोठ्या प्रमाणात ...

-----------

भाजपचा ढोंगी आक्रोश

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळात म्हणजेच सन २०१४ पूर्वी राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून ते शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत काही मोजक्या मंडळींनीच त्या विरोधात जोरदार आघाडी त्यावेळी उघडली होती. न्यायालयातही याचिका दाखल झाल्या. त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपनेही सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीविरोधात आवाज उठवला होता. येथवर ठीक होते, पण २०१४ मध्ये भाजप राज्याच्या आणि देशाच्या सत्तेत आली. त्यावेळी त्यांना सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची सखोल चौकशी करता आली असती. मात्र राजकीय हिशोब डोळ्यापुढे ठेवून भाजपने पाच वर्षे काहीच केले नाही. पाच वर्षांनी राज्यातली सत्ता गेल्यानंतर मात्र पुन्हा त्यांना या विषयाची आठवण झाली आहे. त्यामुळेच पाच वर्षे ईडी काय झोपली होती का, हा राजू शेट्टी यांचा प्रश्न अचूक आहे. सहकारी कारखान्यांच्या विक्रीला आता दहा-बारा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. दरम्यानच्या काळात कागद रंगवण्याची, लपवालपवी करण्याची भरपूर संधी संबंधितांना मिळालेली आहे. नव्हे ती राजकीय सोयीपायी देण्यात आली आहे. त्यामुळेच आता करा कोणाला काय चौकशी करायची ती, अशी उद्दाम भाषा काहीजण करू शकतात. मात्र यावर बोलण्याचा अधिकार भाजपला किती याचे आत्मपरीक्षण भाजपच्या नेत्यांनी करावे. कारण खरोखरीच त्यांना सहकार क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची चाड असती तर पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी या विषयाचा सोक्षमोक्ष लावला असता. आता भाजपकडून दाखवला जाणारा आक्रोश हा ढोंगी असल्याचे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणू लागले आहेत ते त्यामुळेच.