शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

अनिश्चिततेच्या काळात प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी करताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये मनाची तयारी करून पद्धतशीरपणे प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी काही सूचना उपयुक्त ठरू शकतात. - प्रवेशपूर्व परीक्षा ...

अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये मनाची तयारी करून पद्धतशीरपणे प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी काही सूचना उपयुक्त ठरू शकतात.

- प्रवेशपूर्व परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात घ्यावे की, प्रवेश परीक्षा या अपरिहार्य असून त्या पुढील काही महिन्यांत निश्चितपणे पार पडतील.

- विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता व गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवून देण्यासाठी सरकारकडे पूर्व परीक्षांशिवाय कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवेश परीक्षा निश्चित घेतल्या जातील. बारावीच्या परीक्षांप्रमाणे रद्द होणार नाहीत.

- सध्या उपलब्ध झालेल्या अतिरिक्त वेळेकडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. या वेळेचा वापर प्रवेश परीक्षांची तयारी अधिक फलदायी करण्यासाठी झाला पाहिजे. आपल्याला अवघड वाटणा-या विषयांचा पुन्हा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.

- हा वेळ अधिक सराव चाचण्या देऊन परीक्षेबाबतची आपली नियोजन आणि रणनीती अधिक सुधारण्यासाठी वापरला पाहिजे.

- प्रवेशपूर्व परीक्षांसाठी आपण करत असलेला अभ्यास फक्त या परीक्षांसाठी नसून याचा उपयोग पदवी अभ्यासक्रमांसाठी पाया निर्माण करण्यात उपयुक्त ठरतो. त्यामुळे परीक्षेची कुठलीही स्पष्ट तारीख नसताना अभ्यास करणे फलदायक ठरणार नाही, असे समजू नका.

- सातत्याने अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असेल तर त्यांनी थोडाकाळ विश्रांती घ्यावी. आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. त्यानंतर पुन्हा ताजेतवाने होऊन प्रवेश परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा.

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा संभ्रम निर्माण झाला असेल तर मनोबल वाढविण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी दैनंदिनीमध्ये व्यायाम, योगा, प्राणायाम अथवा ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा अभ्यासाला लागणे अधिक सोपे जाईल.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रवेश परीक्षांमधील बहुतांश विद्यार्थ्यांची सरासरी कामगिरी अतिशय खराब दिसून आली आहे. प्रत्येक वर्षी एमएचटीसीईटीमध्ये सुमारे ९३ टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत, जेईई मेन्समध्ये सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांना २५ टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. तसेच नीटमध्ये ९० टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की दरवर्षी बहुतांश विद्यार्थी हे या परीक्षांची योग्य तयारी करत नाहीत. त्यामुळे यावर्षी उपलब्ध झालेला अतिरिक्त वेळ हा परीक्षेच्या तयारीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने वापरून विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करून दाखवता येऊ शकते.

- दुर्गेश मंगेशकर, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक

-------------------------------