शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:07 IST

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

बाणेर : नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करीत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाºया चौकात सिग्नल सुरू करण्यास पालिका व वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.लाखो रुपये खर्च करून राधा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत; मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मुंबई-बंगळुरू या द्रुतगती मार्गावरील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवारस्त्यांची सुविधा आहे.अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे अजूनही वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत प्रवास करत आहेत. त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक-वाहनचालकांकडून केली जात आहे.