शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

सिग्नल यंत्रणा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:07 IST

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

बाणेर : नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करीत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाºया चौकात सिग्नल सुरू करण्यास पालिका व वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.लाखो रुपये खर्च करून राधा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत; मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मुंबई-बंगळुरू या द्रुतगती मार्गावरील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवारस्त्यांची सुविधा आहे.अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे अजूनही वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत प्रवास करत आहेत. त्यामुळे पालिका व वाहतूक विभागाने गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक-वाहनचालकांकडून केली जात आहे.