शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना कधी मिळणार हक्काची जागा?

By admin | Updated: April 25, 2016 02:09 IST

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सध्या स्थिती अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ५९० अंगणवाड्या भरत आहे.

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सध्या स्थिती अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ५९० अंगणवाड्या भरत आहे. मात्र, त्यातील निम्म्या म्हणजे २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने चिमुरड्यांना ऊन, वारा, पावसाचा सामना करत ‘अ, ब, क’ चे धडे गिरवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये ४ हजार ५९० अंगणवाड्या भरत आहेत. मात्र, त्यातील २ हजार ३३४ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे, तर उर्वरित २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने त्या इतर ठिकाणच्या जागेवर भरवण्यात अंगणवाडी सेविकांना मोठी कसरत करावी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांबरोबर चिमुरड्यांना ऊन, वारा, पावसामध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. विशेषत: २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने इतर जागांवर घ्यावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने खासगी जागेत २५७, समाजमंदिरांमध्ये ७१३, झाडाखाली किंवा चावडीमध्ये ११२, तर प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या खोल्यांमध्ये ८३२ ठिकाणी अंगणवाडी सध्या भरत आहे. त्याचबरोबर त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ३२२ खोल्यांमध्ये अंगणवाडी भरवण्यात येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि आदिवासी उपाययोजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येतो. मात्र, हा निधी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त १५० अंगणवाड्यांना हा निधी देण्याची मर्यादा आहे. त्यामुळे यावर २ हजार २३६ अंगणवाड्यांना इमारती बांधकाम तातडीने करण्यासाठी अडथळा येत आहे. त्यामुळे याबाबत खासदार, आमदार आणि स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रयत्न करणे अंत्यत गरजेचे झाले आहे. पुणे जिल्ह्यातील या २ हजार २३६ अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी खासदार आणि आमदार यांच्या स्थानिक विकासकामांच्या निधीमधून या अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे अंगणवाडी सेविकांबरोबर स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. अन्यथा या चिमुरड्यांची पुढील शैक्षणिक वर्षात त्यांची हेळसांड होईल. त्यामुळे याबाबत पावले उचलणे गरजेचे आहे.सव्वादोन हजार अंगणवाड्यांना नाही इमारतजिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील एकूण ४ हजार ५९० अंगणवाड्यांपैकी जवळपास २ हजार २३६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने चिमुरड्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही पार्श्वभूमी पाहता चिमुरड्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासन, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांनी याविषयी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची भावना अनेक अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे.