शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना आरक्षण कधी, केव्हा, कसे? (‘मंथन’साठी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

-राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ ---------------------- विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या याचिकेत मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च ...

-राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ

----------------------

विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या याचिकेत मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केले. हा निकाल देताना न्यायालयाने तीन बाबी प्रामुख्याने नमूद केल्या. पहिला मुद्दा होता तो म्हणजे पूर्णवेळ, समर्पित आयोग स्थापन करुन राज्य सरकारने ओबीसींच्या समकालीन स्थितीचा अभ्यास करावा. ओबीसींच्या मागासलेपणाचा तपशील गोळा करावा. दुसरा मुद्दा म्हणजे या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित करावी. तिसरे म्हणजे ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती या तिघांचे एकत्रित आरक्षण पन्नास टक्क्यांच्यापुढे जाता कामा नये. फेब्रुवारी २०२२ नंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे सगळे शक्य होईल का हा मुद्दा आहे. आता सप्टेंबर चालू आहे. फेब्रुवारीतल्या निवडणुकीसाठी जेमतेम सहा महिने आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध वेळेत ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक सर्वेक्षण पूर्ण होणे अशक्य दिसते; मात्र निर्धारित वेळापत्रकानुसारच राज्य सरकारला निवडणुका घ्याव्या लागतील हे निश्चित आहे.

गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यानुसार राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाला पूर्णवेळ आयोगाचा दर्जा दिला. या आयोगानेच ओबीसींचा डेटा गोळा करावा असे ठरले. पण या खटल्याचा निकाल लागूनही आता सहा महिने झाले. काहीच हालचाल नाही. माझी माहिती अशी आहे की ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तोही ‘क्वालिटेटिव्ह’ आणि ‘क्वांटिटेटिव्ह’ स्वरुपात गोळा करण्यासाठी आयोगाने साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारला मागितला आहे. हा निधी मिळत नाही तोवर आयोग पुढे जाऊ शकत नाही. पूर्ण लोकसंख्येची मोजणी करुन मग ओबीसींची टक्केवारी आयोगाला काढावी लागेल. तशी मोजली नाही तर अडचण आहे.

ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करायचे आहे. ओबीसींचे राजकीय व अन्य मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचे निकष आयोगाने निश्चित करायचे आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करुन त्या आधारे आयोग राज्य सरकारला शिफारस करेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज ओबीसींना आरक्षण मिळू शकत नाही. भीती अशी आहे की निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार थातूरमातूर सर्वेक्षण करुन आरक्षण देईल. घाईगडबडीतले हे सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले तर मग लोक कोर्टात भांडत बसतील.

चौकट

वडेट्टीवारांचा महाराष्ट्रद्रोह

दोन मुद्दे अत्यंत कळीचे आहेत. राज्यातल्या परप्रांतीयांची संख्या काही लाखात आहे. त्यांच्यातल्या ओबीसींची मोजणी होणार का? वास्तविक राज्यातल्या मूळ रहिवाशांनाच आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु या महत्त्वाच्या मुद्याला बगल देत बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार वेगळीच भूमिका घेतात. ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागास आयोगाकडे प्रस्ताव पाठवा असे वडेट्टीवारांसारखा राज्याचा मंत्रीच मुंबईतल्या परप्रांतीयांना जाहीरपणे सांगतो. राज्याच्या मंत्र्यांचीच ही भूमिका महाराष्ट्रातल्या स्थानिक ओबीसींच्या विरोधातली आहे. आरक्षणाचा लाभ राज्याच्या मूळ रहिवाशांनाच मिळावा असा कायदा देखील सांगतो हे वडेट्टीवारांनी लक्षात घ्यावे.

चौकट

चार कर्मचाऱ्यांचा आयोग

राज्य मागासवर्गीय आयोगाकडे फक्त चार कर्मचारी आहेत. त्यांचे ऑफिस तीनशे स्क्वेअर फुटाचे. आयोगाला एक सचिव आणि दहा सदस्य. एवढ्या मनुष्यबळावर आरक्षण देण्यासाठीचे सर्वेक्षण कधी आणि कसे पूर्ण होणार? हे आव्हान पेलण्यासाठी आयोगाला फार मोठी यंत्रणा उभी करुन द्यावी लागेल.