शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र योजनेचे पाणी सर्वत्र पोहोचणार कधी?

By admin | Updated: May 4, 2017 02:27 IST

वास्तविक कॅन्टोन्मेंटच्या संपूर्ण हद्दीत मलकापूर पॅटर्नप्रमाणे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे

- देवराम भेगडे -वास्तविक कॅन्टोन्मेंटच्या संपूर्ण हद्दीत मलकापूर पॅटर्नप्रमाणे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. सद्य:स्थितीत राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा ३७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असताना बोर्डाकडून मात्र पाणी कपातीबाबत काहीही निर्णय झालेला नाही. याचे आश्चर्य वाटते.  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने जानेवारी २००७ मध्ये १६ एमएलडी क्षमतेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कोणत्याही सरकारी मदतीशिवाय नागरिकांच्या कररुपी पैशातून सुमारे पावणेसहा कोटी रुपये खर्चून सुरू केली. मात्र, बोर्ड प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील नियोजनाचा प्रचंड अभाव व संथ कारभारामुळे बोर्ड हद्दीतील निगडीतील सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, श्रीनगरी, समर्थनगरी, दत्तनगर, आशीर्वाद कॉलनी, परमार कॉम्प्लेक्स, तसेच चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, माळवाडीचा काही भाग, काळोखेमळा, जाधव मळा, हगवणे मळा या ग्रामीण पट्ट्यात अद्यापही योजनेचे पाणी पोहोचविण्यात अपयश आले आहे. योजनेचे पाणी मिळण्यास संबंधित भागातील नागरिकांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करायला लागणार याचे उत्तर मिळत नाही. या योजनेचे पाणी ज्या भागात मिळत नाही, त्याठिकाणी एमआयडीसी तसेच टॅँकरमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्ची पडत आहे. विविध प्रभागांत पाण्याचा अपव्यय, पाणीगळती व चोरी रोखण्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नसल्याने पाण्याचा अमर्याद वापर होतो. हे सार्वत्रिक चित्र बदलण्याची गरज आहे. निगडीतील सिद्धिविनायक नगरी, श्रीविहार, श्रीनगरी, समर्थनगरी, दत्तनगर, आशीर्वाद कॉलनी, परमार कॉम्प्लेक्स भागात सध्या महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सिद्धिविनायक नगरीच्या काही भागात पाणीपुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल यांच्या पुढाकाराने महापालिकेत महापौरांसह आयुक्त, संबंधित अधिकारी, मावळचे आमदार बाळा भेगडे, कॅन्टोन्मेंटचे सीईओ तसेच पदाधिकारी यांची बैठक झाली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित भागात अद्यापही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, माळवाडीचा बोर्डाच्या हद्दीत येणारा काही भाग, काळोखेमळा, हगवणे मळा, जाधवमळा भागातील नागरिकांना बोर्डाच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्याबाबत अनेकदा मागणी केल्यानंतर बोर्डाच्या सभेत धोरणात्मक काही वर्षांपूर्वी निर्णय झाला होता. पण, योग्य पद्धतीने अंमलबजावणी न झाल्याने योजनेचे पाणी या भागात पोहोचलेच नाही. चिंचोली, किन्हई व झेंडेमळा भागात पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी पाणी विकत घेण्यात येत असून, सदर बिलापोटी गेल्या सव्वादहा वर्षांत सुमारे आठ कोटींहून अधिक रक्कम खर्ची पडली आहे. काही भागात थेट मोटारी लावून पाणी ओढण्याचा प्रकार घडत आहे. नवीन योजनेच्या तसेच इतर भागातही जलवाहिनीला भोके पाडून अनधिकृतरीत्या नळजोड घेण्याचा प्रकार घडत आहेत. त्यावर बोर्डाचे नियंत्रण नसल्याने मोठा महसूलही बुडत आहे. कोणत्याच भागात मीटर नसल्याने अमर्याद पाणी वापर होत आहे. सार्वजनिक नळकोंडाळ्यावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असताना बोर्डाकडून कारवाई अगर पाणीवापराबाबत जनजागृती होताना दिसत नाही. पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन होताना दिसत नाही. स्वतंत्र योजनेचा पूर्ण क्षमतेने वापर केला जात नाही. फक्त देहूरोड बाजार, मामुर्डी, शितळानगर, गांधीनगर, आंबेडकरनगर व परिसरातील काही भागांपुरती योजना मर्यादित असल्याचे दिसत आहे. याभागासाठी केवळ पाच ते सहा एमएलडी पाण्याचा वापर होत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाला पाणी उचलण्याची पूर्ण रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे हद्दीत पाण्याप्रमाणेच जनतेच्या पैशांचाही अपव्यय होत आहे. चिंचोली, किन्हई व झेंडेमळा या भागासाठी डिसेंबर २००७ मध्ये बोर्ड बैठकीतील ठरावानुसार पाण्याच्या मुख्य टाकीवर बुष्टर यंत्रणा बसविणे व त्याकरिता थ्री फेज जोडणी घेण्याचे निश्चित केले होते. त्याकरिता फक्त १२ लाख खर्च अपेक्षित होता. प्रशासनाने ठरावाची अंमलबजावणी का केली नाही. याचा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी शोध घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची गरज आहे.