शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

जेव्हा वीज जाते... तेव्हा नळाला पाणी येते...!

By admin | Updated: January 19, 2016 01:49 IST

भारनियमन हवंसं वाटतं, असं म्हणणारं गाव खरोखरंच विरळा. पण वीज जाताच घरात पाणी येत असेल तर?... यवत गावातील ग्रामस्थ त्यामुळेच कधी एकदा

यवत : भारनियमन हवंसं वाटतं, असं म्हणणारं गाव खरोखरंच विरळा. पण वीज जाताच घरात पाणी येत असेल तर?... यवत गावातील ग्रामस्थ त्यामुळेच कधी एकदा भारनियमन होतेय, याचीच वाट पाहताना दिसतात. कारण तो संकेत असतो, नळाला पाणी येण्याचा...!भारनियमनाच्या काळात तासन्तास वीज गायब असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती तशी नवीन नाही. यवत गावात सध्या गावठाण फिडरवर कसलेही भारनियमन नाही. तरीही नागरिक व विशेषत: महिलावर्ग वीज कधी जाईल, याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येते. ही वाट पाहण्याचे एकमेव कारण म्हणजे पाणीटंचाई. यंदा जानेवारी महिन्यातच यवतमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या परिस्थिती पाण्याचा मर्यादित वापर करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नळाला पाणी आल्यानंतर गावात काही लोक नळाला लावलेल्या मोटारद्वारे पाणी ओढतात. याचा परिणाम असा होतो, की ज्यांच्याकडे नळाला मोटार आहे त्यांनाच पाणी मिळते. अनेकांच्या नळाला पाणी येतच नसल्याच्या तक्रारी होत्या. यवत ग्रामपंचायतीने नामी उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे नळाला पाणी सोडण्यात आल्यानंतर गावातील वीजपुरवठा खंडित करणे. नळाला पाणी सोडल्यानंतर गावातील वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे सर्वांच्या नळाला पाणी येते. ऐन रंगात आलेली मालिका जेव्हा भारनियमनाने बंद होते तेव्हा महिलावर्ग त्रागा करतात, मात्र सध्या गावात वीज गेली, की महिला नळाला पाणी आले असेल, म्हणून आनंदित होतात व हंडा-कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी धावतात.