शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चिंचवड-रोहा रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

By admin | Updated: June 10, 2017 02:11 IST

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी चिंचवड ते रोहा हा लोहमार्ग प्रस्तावित आहे. सर्वेक्षणही झाले आहे. मात्र, केंद्र, राज्य

विश्वास मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी चिंचवड ते रोहा हा लोहमार्ग प्रस्तावित आहे. सर्वेक्षणही झाले आहे. मात्र, केंद्र, राज्य आणि रेल्वे विभागाने निधीचा हिस्सा कोणी किती उचलायचा याबाबत एकमत आणि ठोस निर्णय होत नसल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. कोकणवासीयांची वाट सुकर करणाऱ्या लोहमार्ग आर्थिक विवंचनेत आहे.केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यातील प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. पुणे-नाशिक आणि चिंचवड- रोहा हे रेल्वेमार्ग तयार करण्यासंदर्भात सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते. रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी असताना त्यांनी या मार्गाचे सर्वेक्षणही केले होते. मात्र, पुढे या मार्गाला गती न मिळाल्याने हे दोन मार्ग कागदावरच होते. तसेच पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी संघटनांनीही याविषयावर आवाज उठविला होता. लोकमतने याविषयी आता बास या उपक्रमांतून हा प्रश्न किती गंभीर आहे, हे वृत्तमालिकेच्या माध्यमातून मांडले होते. रेल्वेच्या प्रश्नांवर आवाज उठविला होता. त्यानंतर मावळच्या खासदारपदी श्रीरंग बारणे निवडणूक आल्यानंतर ‘लोकमत’च्या मालिकेचा आधार घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. 1हिंजवडी-पुणे ही मेट्रो करण्यास चालना दिली गेली़ मात्र, चिंचवड-रोहा मार्गाबाबत राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेचारशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एकूण खर्चापैकी रेल्वे, राज्य शासन किती हिस्सा उचलणार याबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास गती मिळालेली नाही. पुणे-मुंबई लोहमार्गावरील चिंचवड जंक्शन येथून हिंजवडीतून पुढे रोह्याकडे मार्गस्थ होणार आहे.2 सध्या हिंजवडीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. हा नवा मार्ग सुरू झाल्यास वाहतूककोंडीवर नियंत्रण आणता येणार आहे. तसेच हिंजवडीतील लाखो अभियंत्यांचा प्रवास सुकर होणार आहे. या मार्गामुळे हिंजवडीकरांना रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास पुणे किंवा चिंचवड स्टेशनला यावे लागत होते. मात्र, रोहामार्गामुळे हिंजवडीही रेल्वेला जोडली जाणार आहे. त्यामुळे आयटीयन्सना प्रवास सुकर होणार आहे. दोन वेळा सर्वेक्षण४खासदार कलमाडी मंत्री असताना त्यांनी चिंचवड रोहा मार्गाचे सर्वेक्षण करवून घेतले होते. त्यानंतर २००७-२००८ या कालखंडातही सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून त्यापुढील मार्ग भूसंपादन, त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सर्वेक्षण होऊन त्यावर कोणतीही प्रगती झालेली नाही. हा प्रस्ताव कागदावरच होता.