शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीएसला मुहूर्त कधी?

By admin | Updated: July 1, 2015 23:45 IST

औंध-रावेत बीआरटीएस या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक त्यामुळे दिवसागणीक जनतेच्या पैशांची लूट होत आहे.

विश्वास मोरे , पिंपरीऔंध-रावेत बीआरटीएस या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक त्यामुळे दिवसागणीक जनतेच्या पैशांची लूट होत आहे. महापालिकेचे या कामावर नियंत्रण नसल्याने तीन वेळा उद्घाटनासाठी मुहूर्तही काढूनही अद्यापपर्यंत वेळेत काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या मार्गाच्या उद्घाटनास मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न शहरवासीय करीत आहेत. एकाच मार्गासाठी वेगवेगळे ठेकेदार काम करीत असल्याने त्यांच्यात कामाबाबत समन्वय नाही. मार्गांच्या कामात एकसंधता नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजर्नंतर्गत (जेएनएनयूआरम) सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वारगेट ते निगडी या बीआरटीएस मार्ग तयार करण्याच्या विषयास मंजुरी मिळाली. त्यामागे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दळणवळण सुसह्य व्हावे, शहरवासीयांचा कमी वेळेत गतिमान प्रवास व्हावा, असा उद्देश होता. त्यानंतर देहू-आळंदी-काळेवाडी फाटा, रावेत-औंध, वाकड ते नाशिक फाटा या मार्गांवरही बीआरटी सुरू करावी, असा प्रस्ताव पुढे आला. याबाबतचे नियोजन महापालिकेने केले. कोट्यवधींचा खर्च करूनही शहरातील एकही मार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. उलट हे मार्ग अडचणींचे ठरले आहेत. -शहरातील बीआरटीएस प्रकल्पाची सुरुवात २००७मध्ये करण्यात आली. सुरुवातीला ४५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा एक भाग म्हणून सुरुवातीला दोन मार्गांवर नियोजन करण्यात आले. त्यानंतर २००९मध्ये त्यात वाढ करून शहरातील वेगवेगळ्या दहा मार्गांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता यासाठी ३७६ कोटी रुपयांचा खर्चही केला. हा मार्ग अर्धवटच आहे. या मार्गांपैकी औंध-रावेत हा मार्ग अगोदर सुरू करू, अशी घोषणा गतवर्षी महापालिकेने केली होती. डिसेंबर २०१४मध्ये अहमदाबाद येथे बीआरटी प्रकल्प पाहणीसंदर्भात दौरा झाला. अधिकाऱ्यांनी औंध-रावेत हा मार्ग १ मार्च २०१५पासून सुरू होईल, असे प्रतिनिधींना सांगितले होते. दुभाजकाबाबत एकसंधता नाही-रावेत ते औंध या मार्गावरील बीआरटीएसच्या लेनमधील दुभाजकाबाबत एकसंधता नसल्याचे दिसून येते. मुकाई चौक रावेतपासून पुनावळेजवळील पुलापर्यंतच्या रस्त्यावर कोठेही दुभाजक नाही. पुढे ताथवडेच्या अर्धा किलोमीटर अलीकडे रस्त्यावर दुभाजक सुरू होतो. त्याची उभारणीही हवी तशी केली आहे. येथून डांगे चौकापर्यंतच्या दुभाजकामध्ये झाडांचे रोपण केले आहे. पुढे जगताप डेअरी ते औंध जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक नाही. हे काम पूर्णपणे अपूर्ण आहे. रस्ता दुभाजकासाठी आवश्यक असणारे साहित्य रस्त्यावरच पडले आहे. ताथवडेजवळील दुभाजकाचे कामही एकसारखे नाही. काही ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याचे दिसून येते. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी-निगडी ते दापोडी हा बीआरटीचा पहिला मार्ग सुरू करणे अपेक्षित असताना औंध-रावेत मार्गाच्या कामास गती दिली गेली आहे. डांगे चौकापासून मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्यावर लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे लहान-मोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते आणि त्यांच्यांशी संबंधित व्यावसायिकांचे हे प्रकल्प आहेत. बहुतांश बांधकाम व्यावसायिकांनी बीआरटीएस मार्गाजवळ प्रकल्प अशी जाहिरातबाजीही केली आहे. त्यामुळे बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी बीआरटीचा घाट घातला आहे. वळणावरच बसथांबा-रावेतमधून जाणाऱ्या लेनवर दुभाजक नाही. तसेच ज्या ठिकाणी बसस्टॉप उभारले आहेत, तिथे रस्ता अरुंद झाला झाला आहे. तसेच, रावेत गावाजवळ वळणावरच बसस्टॉप उभारला आहे. त्यामुळे वाहनचालकास कसरत करावी लागणार आहे. मुकाई चौकातील टर्मिनल्सचे काम पूर्ण झालेले नाही. मुहूर्त काढला, पण उद्घाटन नाही-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने बीआरटी मार्गांची घोषणा केली होती. त्यामुळे आपल्याच कालावधीत या प्रकल्पांचे उद्घाटन व्हावे, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते प्रयत्नशील होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील एका मार्गाचे उद्घाटन करायचे, असे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, काम वेळेत न झाल्याने हे उद्घाटन लांबले. त्यानंतर कामगार दिनाचा मुहूर्त ठरला. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची बैठक घेऊन लवकरात लवकरच काम पूर्ण करावे, अशी सूचना केली होती. वाहतूक नियंत्रण यंत्रणा, पुलाचे काम अपूर्ण-डांगे चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरनगर येथे पुलाचे काम सुरू आहे. हे काम नुकतेच सुरू झाले आहे. सायंकाळी येथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसेच जिल्हा रुग्णालयाजवळील रस्त्यावरील पूल, बसथांबा बीआरटी लेन याबाबत नियोजन नसल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यापुढे पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटी लेनला अजून मुहूर्तही मिळालेला नाही. तसेच सध्या असणाऱ्या वाहतूक नियंत्रण यंत्रणेत बदल केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.रस्ता एकच; काम मात्र तीन ठेकेदारांना-बीआरटी लेन एकच आहे. मात्र, त्यासाठी तीन वेगवेगळे ठेकेदार काम करीत आहेत. त्यांच्या कामावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वचक आणि नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मनमानीपणे काम सुरू असल्याचे दिसून येते. जगताप डेअरी ते औंध पुलापर्यंतच्या रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी कामे अपूर्ण आहेत. कामाबाबतच्या नियोजनात समन्वय नसल्याने अजूनही या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. -याच मार्गावर बसथांबा आणि चौकात पेडिस्ट्रियन सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या ९३ लाख १५ हजार ६३५ रुपयांच्या विषयास मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. सिग्नलची निविदा मंजूर होऊन कामाचा आदेश आणि प्रत्यक्ष कामास वेळ लागणार आहे.