शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारातील दोषींवर कडक कारवाई कधी?

By admin | Updated: July 29, 2014 03:33 IST

आॅगस्ट क्रांतिदिनी मावळात पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी ठार झाल्यानंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल

विश्वास मोरे, पिंपरीआॅगस्ट क्रांतिदिनी मावळात पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी ठार झाल्यानंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल जूनमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला. चर्चा झालीच नाही, या अहवालात बंद पाइपलाइन शेतकरी हिताविरोधात नव्हती. त्यास राजकीय स्वरूपाचा विरोध झाला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात प्रामाणिकपणा नव्हता. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी गेलेला गोळीबार असमर्थनीय असल्याचे म्हटले आहे. अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही समितीने सरकारला केली आहे. मावळ गोळीबारातील दोषी पोलीसांवर कडक कारवाई कधी? असा सवाल मावळवासीय करीत आहेत. आदेश कोणाचा हे आजही गूढच!डिसेंबर २०१४ मधील नागपूरच्या अधिवेशनात या संदर्भातील अहवालाबाबत लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचे सभागृहाने सांगितले होते. मात्र, त्या अहवालाची प्रत लोकप्रतिनिधींना दिली नव्हती. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या अधिवेशन संपण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर अहवालाची सीडी आमदारांना देण्यात आली. सभागृह पटलावर अहवालाची चर्चा झालीच नाही. विरोधी पक्षातील नेते, स्थानिक आमदारांनी आवाज उठवूनही सरकारने चर्चा का टाळली. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आमदार संजय भेगडे यांनी अहवालाची प्रत मिळावी, म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र दिले होते. त्यानंतर जून महिन्यांत अहवालाची प्रत मिळाली. मावळच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातीलच बड्या नेत्याने केला. त्याच्याच आदेशाने गोळीबार झाला, असा आरोप विरोधी पक्षाने केला होता. मुख्य सूत्रधार कोण, कोणाच्या आदेशाने गोळीबार झाला, याबाबत अहवालात काहीही उल्लेख नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधारही कळू शकला नाही. हे प्रकरण चिघळविण्यास राजकीय फूस होती का, शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्याबाबतही अहवालात फारसे ठोस काही नाही. दोषी पोलिसांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न मावळातील शेतकरी करीत आहेत.