शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

गोळीबारातील दोषींवर कडक कारवाई कधी?

By admin | Updated: July 29, 2014 03:33 IST

आॅगस्ट क्रांतिदिनी मावळात पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी ठार झाल्यानंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल

विश्वास मोरे, पिंपरीआॅगस्ट क्रांतिदिनी मावळात पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी ठार झाल्यानंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल जूनमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला. चर्चा झालीच नाही, या अहवालात बंद पाइपलाइन शेतकरी हिताविरोधात नव्हती. त्यास राजकीय स्वरूपाचा विरोध झाला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात प्रामाणिकपणा नव्हता. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी गेलेला गोळीबार असमर्थनीय असल्याचे म्हटले आहे. अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही समितीने सरकारला केली आहे. मावळ गोळीबारातील दोषी पोलीसांवर कडक कारवाई कधी? असा सवाल मावळवासीय करीत आहेत. आदेश कोणाचा हे आजही गूढच!डिसेंबर २०१४ मधील नागपूरच्या अधिवेशनात या संदर्भातील अहवालाबाबत लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचे सभागृहाने सांगितले होते. मात्र, त्या अहवालाची प्रत लोकप्रतिनिधींना दिली नव्हती. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या अधिवेशन संपण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर अहवालाची सीडी आमदारांना देण्यात आली. सभागृह पटलावर अहवालाची चर्चा झालीच नाही. विरोधी पक्षातील नेते, स्थानिक आमदारांनी आवाज उठवूनही सरकारने चर्चा का टाळली. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान आमदार संजय भेगडे यांनी अहवालाची प्रत मिळावी, म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र दिले होते. त्यानंतर जून महिन्यांत अहवालाची प्रत मिळाली. मावळच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातीलच बड्या नेत्याने केला. त्याच्याच आदेशाने गोळीबार झाला, असा आरोप विरोधी पक्षाने केला होता. मुख्य सूत्रधार कोण, कोणाच्या आदेशाने गोळीबार झाला, याबाबत अहवालात काहीही उल्लेख नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधारही कळू शकला नाही. हे प्रकरण चिघळविण्यास राजकीय फूस होती का, शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्याबाबतही अहवालात फारसे ठोस काही नाही. दोषी पोलिसांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न मावळातील शेतकरी करीत आहेत.