शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

शासकीय रुग्णालय उभारणार कधी?

By admin | Updated: December 6, 2014 04:03 IST

विनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे

मंगेश पांडे, पिंपरीविनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. या वर्षात दहा महिन्यांत झालेल्या अपघातांत ३८ जणांना जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावरील सर्वांत मोठी गैरसोय म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी संपूर्ण महामार्गावर सर्व सुविधांनी युक्त एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही. यामुळे खासगी रुग्णालयांचे फावले असून, रुग्णांची भरमसाट आर्थिक लूट केली जाते. पुणे-मुंबई ही शहरेअगदी जवळ आली आहेत. दररोज अनेकजण पुणे-मुंबईला ये-जा करतात. अशातच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीच्या समस्येसह अपघातही वाढले. दोन्ही शहरांमधील प्रवास वेळखाऊ होऊ लागला. या सर्व समस्या सुटाव्यात, अपघात कमी व्हावेत यासाठी मोठ्या अपेक्षेने दु्रतगती महामार्ग बांधण्यात आला. मात्र, अपघातग्रस्तांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालय उभारण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अपघातानंतर जखमीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. हे उपचार खासगी रुग्णालयातूनच मिळावेत, अशीच व्यवस्था केली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या महामार्गावर एकही शासकीय रुग्णालय नाही. दु्रतगती महामार्गावर हवी तशी उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निगडीतील एका खासगी रुग्णालयाच्या पाच रुग्णवाहिका देहूरोड ते लोणावळ्यादरम्यान उभ्या असतात. तसेच लोणावळा ते मुंबईदरम्यान नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका असतात. याव्यतिरिक्त एका खासगी कंपनीच्या तीन रुग्णवाहिका आहेत.