शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

By admin | Updated: June 29, 2015 06:33 IST

मालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

संजय मानेमालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील पोलीसही त्यास अपवाद ठरले नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अशा जीवघेण्या हातभट्ट्या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर उशिरा सुचणारे शहाणपण काय कामाचे, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दारूनिर्मितीसाठी आवश्यक रसायनसाठा असलेल्या ठिकाणी निराधारनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी ठिणगी पडून आग लागली. झोपड्या आगीत खाक झाल्या. तेथील महिला, रहिवासी भाजले. दारूसाठ्याच्या ठिकाणी छापा टाकण्यास गेलेले उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारीसुद्धा आगीत भाजून मृत्युमुखी पडले. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अशा बेकायदा दारूभट्ट्या, हातभट्टी दारूनिर्मितीचे अड्डे पिंपरी-चिंचवडमधून तेव्हाच हद्दपार होणे आवश्यक होते. मालवणी अथवा राज्यात अन्य ठिकाणी विषारी दारू दुर्घटना घडावी, नंतर कारवाईची पावले उचलावीत, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा करण्याची काही गरज नव्हती. मालवणीतील दुर्घटनेनंतर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांवर गुन्हे दाखल केले. मुद्देमाल जप्त केला. परंतु, त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांतच दारूभट्ट्या सुरू होतील. आणखी कोठे तरी दुर्घटना घडून येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे सर्वांना ज्ञात झाले आहे. विषारी दारूने अनेकांचा बळी जातो. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संसार उघड्यावर पडतात. केवळ विषारी दारूच्या दुर्घटनाच नव्हे, तर असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातही अनेकांचे बळी जात आहेत. संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते रोखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? असा मुद्दा या अनुषंगाने उपस्थित झाला आहे. मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडतात. अनेकदा खूनही पडतात. अनेक जण जुगारात हरतात. संसाराची वाताहात होते . समाजहिताला बाधा आणणारे हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला कशाची प्रतीक्षा आहे? असे प्रकार सुरू असल्याची माहिती बाळगणारे, अवैध धंदे बंद करा, अशी मागणी करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाच्या याद्या मटकेवाल्यांकडे जमा होतात. त्यांना वेळचेवेळी हप्ते मिळतात. कोणी आवाज उठवीत नाही, कोणाची तक्रार नाही, म्हणून पोलीससुद्धा काही करीत नाहीत. -