शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

कांद्याला कोणी भाव देतंय का भाव?

By admin | Updated: January 28, 2017 00:10 IST

कांदा काढणीला आलाय.. कोबी, फ्लॉवर बी काढायला आलीय... बीट परिपक्व झालंय... परंतु बाजारात पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने

शेलपिंपळगाव : कांदा काढणीला आलाय.. कोबी, फ्लॉवर बी काढायला आलीय... बीट परिपक्व झालंय... परंतु बाजारात पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने पिकावरील भांडवलही वसूल होत नाही. परिणामी, आमच्या पिकाला कोणी भाव देतं का, भाव? असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामातील महत्त्वाच्या कांदापिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र कांदाकाढणीच्या कालखंडातच बाजारात कांद्याचे पडलेले दर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक चिंतेचा विषय बनू लागला आहे. बाजारात पडलेल्या बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील खर्च तरी भागेल का? असा प्रश्न उत्पादकांना सतावू लागला आहे. एकंदरीतच, चालू वर्षी कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार! असे चित्र आत्तापासूनच स्पष्ट होऊ लागले आहे.पुणे जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वातावरणाशी झुंज देत पिकाची जोपासना करून पिकाचे उत्पादन शेतकरी काढत आहे. मात्र, बाजारात कांद्याचे पडलेले भाव सर्वांच्याच नशिबी येत असल्याने मोठा आर्थिक तोटा उत्पादकांना सहन करावा लागणार आहे. अनेक वर्षांपासून कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत; परंतु केंद्र व राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात कुठलेही ठोस उपाय योजले जात नसल्याने दर वर्षी शेतकऱ्यांना बाजारभावासाठी संघर्ष करावा लागतो.चालू वर्षी कांदा उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. शेतजमीन तयार करणे, कांदारोपे, मजूर, लागवड, रासायनिक खते व औषधे, काढणी, बारदाना, वाहतूक आदी लागणाऱ्या खचार्मुळे एकरी उत्पादनासाठी कमीत कमी ५० हजार रुपयांचे भांडवल शेतकऱ्यांना गुंतवावे लागले आहे. हंगामात हवामानाने साथ दिल्याने कांद्याला पोषक वातावरण मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.कांदा हे नाशवंत पीक असल्याने शेतकऱ्यांना त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येत असते. तसेच, आर्थिक गरजेपोटी काढणीनंतर मिळेल त्या भावात बिचाऱ्या शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. कांद्याच्या उत्पादित मालाला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. मात्र, यामध्ये व्यापाऱ्याची पोळी सोयीस्कररीत्या भाजली जात आहे. कांद्याच्या बाजारभावासंदर्भातील शासनाच्या अनिश्चित धोरणाचा दर वर्षी पीक उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाची शाश्वती देण्यासाठी सरकारने उत्पादक खर्चावर आधारित कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.