शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

मसापने मुदतवाढीसंदर्भात घोषित केलेल्या ‘त्या’ समितीचं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाच वर्षांच्या मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावावर वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या खडाजंगीनंतर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत ...

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाच वर्षांच्या मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावावर वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या खडाजंगीनंतर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत अध्यक्षांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या ‘समिती’चं काय झालं? अशी विचारणा आता साहित्य वर्तुळातून होऊ लागली आहे. महिना उलटला तरी कार्यकारी मंडळाने समितीमधील सदस्यांबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही ना आजीव सदस्यांना समितीबाबत काही कळविण्यात आले आहे. दरम्यान, कार्यकारिणीने समितीची स्थापनाच केली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने पाच वर्षे मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावाला २८ जानेवारी रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी विरोध केला होता. सभेत परिषदेचे साताऱ्यामधील विविध शाखांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मुदतवाढीच्या प्रस्तावाच्या बाजूने बहुमताचा कौल गेला. परंतु परिषदेच्या अध्यक्षांनी बहुमताचे संकेत मिळूनही, हस्तक्षेप करीत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत निवडणूक घेण्याकडे कल दर्शविला होता. याबाबत मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा करून ती समिती दर सहा महिन्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून कार्यकारी मंडळाला अहवाल सादर करेल. जर दोन वर्षांत निवडणुका झाल्या नाहीत तर परिषदेला रामराम ठोकेन, अशी जाहीर भूमिका घेतली होती.

सभेतच तातडीने अध्यक्षांनी समितीची स्थापना करून त्यात प्रस्तावाला पाठिंबा असणाऱ्या पाच सदस्यांची वर्णी लावल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे समितीमध्ये तीन बाहेरचे सदस्य आणि दोन कार्यकारी मंडळीतील सदस्य असतील यावर सभेत शिक्कामोर्तब झाले. मात्र या समितीबाबत महिना उलटला तरी कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही.

--

मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे समिती स्थापन करण्याचे सर्व अधिकार हे कार्यकारी मंडळाला देण्यात आले आहेत. त्यांनी समितीची स्थापना केली आहे की नाही याची चौकशी करून सांगेन.

- डॉ. रावसाहेब कसबे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

----

मसापच्या अध्यक्षांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यात तीन बाहेरचे सदस्य आणि दोन कार्यकारी मंडळीतील सदस्य असावेत अशी सूचना देखील मी केली होती. पण महिना उलटला तरी समिती स्थापन केली नसेल तर ही आजीव सदस्यांची घोर फसवणूक आहे.

- अनिल कुलकर्णी, आजीव सदस्य