शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मसापने मुदतवाढीसंदर्भात घोषित केलेल्या ‘त्या’ समितीचं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाच वर्षांच्या मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावावर वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या खडाजंगीनंतर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत ...

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाच वर्षांच्या मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावावर वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या खडाजंगीनंतर नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत अध्यक्षांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या ‘समिती’चं काय झालं? अशी विचारणा आता साहित्य वर्तुळातून होऊ लागली आहे. महिना उलटला तरी कार्यकारी मंडळाने समितीमधील सदस्यांबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही ना आजीव सदस्यांना समितीबाबत काही कळविण्यात आले आहे. दरम्यान, कार्यकारिणीने समितीची स्थापनाच केली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने पाच वर्षे मुदतवाढीसंदर्भातील प्रस्तावाला २८ जानेवारी रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी विरोध केला होता. सभेत परिषदेचे साताऱ्यामधील विविध शाखांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मुदतवाढीच्या प्रस्तावाच्या बाजूने बहुमताचा कौल गेला. परंतु परिषदेच्या अध्यक्षांनी बहुमताचे संकेत मिळूनही, हस्तक्षेप करीत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत निवडणूक घेण्याकडे कल दर्शविला होता. याबाबत मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा करून ती समिती दर सहा महिन्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून कार्यकारी मंडळाला अहवाल सादर करेल. जर दोन वर्षांत निवडणुका झाल्या नाहीत तर परिषदेला रामराम ठोकेन, अशी जाहीर भूमिका घेतली होती.

सभेतच तातडीने अध्यक्षांनी समितीची स्थापना करून त्यात प्रस्तावाला पाठिंबा असणाऱ्या पाच सदस्यांची वर्णी लावल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे समितीमध्ये तीन बाहेरचे सदस्य आणि दोन कार्यकारी मंडळीतील सदस्य असतील यावर सभेत शिक्कामोर्तब झाले. मात्र या समितीबाबत महिना उलटला तरी कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही.

--

मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे समिती स्थापन करण्याचे सर्व अधिकार हे कार्यकारी मंडळाला देण्यात आले आहेत. त्यांनी समितीची स्थापना केली आहे की नाही याची चौकशी करून सांगेन.

- डॉ. रावसाहेब कसबे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

----

मसापच्या अध्यक्षांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यात तीन बाहेरचे सदस्य आणि दोन कार्यकारी मंडळीतील सदस्य असावेत अशी सूचना देखील मी केली होती. पण महिना उलटला तरी समिती स्थापन केली नसेल तर ही आजीव सदस्यांची घोर फसवणूक आहे.

- अनिल कुलकर्णी, आजीव सदस्य