शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अधिकाऱ्यांच्या बदल्या, कर्मचाऱ्यांचे काय?

By admin | Updated: May 6, 2017 02:13 IST

प्रशासकीय नियमांप्रमाणे दोन वर्षांचा सेवा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : प्रशासकीय नियमांप्रमाणे दोन वर्षांचा सेवा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. मात्र, वर्षानुवर्षे मावळात काही पोलीस कर्मचारी हे बस्तान मांडून बसलेले आहेत. त्यांचे काय, असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. प्रशासकीय नियमांप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन वर्षांनी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पाच वर्षांनी केल्या जातात. एकाच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी फार काळ राहिल्यास त्यांचा स्थानिकांशी स्नेह वाढतो व त्यांचा परिणाम कामावर होत असल्याने बदली हा सेवेतील एक अविभाज्य भाग आहे. या नियमांप्रमाणे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या होतात. मात्र, काही पोलीस कर्मचारी हे वर्षानुवर्षे मावळातच सेवा करत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मावळ तालुक्यात पूर्वी चार पोलीस ठाणी होती. सध्या सात पोलीस ठाणी व दोन महामार्ग टॅब आहेत. एका ठाण्यातील सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते तालुक्यातील दुसऱ्या ठाण्यात बदलीचा अर्ज करतात. वरिष्ठांकडे सेटिंग लावून बदली करून आणतात. मावळात कायम राहत असल्याने ते मावळवासीय झाले आहेत. अनेकांनी मावळात स्वत:ची घरे, जागा, जमिनी अशी संपत्ती गोळा केली आहे. वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात राहिल्याने तालुक्यातील राजकारणी, गुन्हेगार व व्यावसायिक यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले असतात. यामुळे अनेक वेळा एखादी अनुचित घटना घडल्यानंतर ती दाबण्यासाठी या जुन्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो. सर्वसामान्यांप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबतही त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने गुन्हेगारी कमी होण्याऐवजी त्यांच्या आशीर्वादाने वाढत चालली आहे. काही मंडळी पोलीस ठाण्यातील केवळ आर्थिक गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र व प्रकरणे सांभाळण्याचे काम पाहतात. यामध्ये कधी स्वत:चे तर कधी वरिष्ठांचे हितसंबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली असते. या मंडळीमुळे ठाण्यात गुन्हेगारांना सौजन्याची वागणूक व सर्वसामान्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळत आहे. मावळातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी काही मंडळी स्वत:चे बस्तान मांडून बसलेली आहेत. खरे तर या जुन्या मंडळींच्या संपर्क व अनुभवाचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गरजेचे असताना त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ जबाबदारी दिली जाते, ही शोकांतिका आहे. किमान एका पोलीस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर किमान त्या अधिकारी वा कर्मचाऱ्याची बदली तालुक्याबाहेर करण्याची तरतूद करण्याची गरज आहे. अन्यथा अशा मंडळींमुळे पोलीस ठाण्यांमध्ये सेटिंगचे प्रकार असेच वाढत जातील. कामकाज : समन्वयाचा अभावनवीन बदलून आलेले प्रभारी अधिकारी व वर्षानुवर्षे बस्तान मांडून बसलेले पोलीस कर्मचारी यांच्यात बरेच वेळा समन्वयाचा अभाव असल्याने एखादी घटना घडल्यास कर्मचारी अधिकाऱ्यांना साथ देत नाहीत. यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडूनही त्यांची उकल होत नाही. अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव अनेक ठिकाणी जाणवत असल्याने त्यांच्यातील अंतर्गत गटबाजीचा फटका हा सर्वसामान्यांना बसत आहे.