शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष का?

By admin | Updated: March 22, 2016 01:54 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले

पुणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले. त्यासाठी केवळ ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि संपूर्ण गुजरात पाण्याच्या बाबतीत सक्षम झाला. असे असताना महाराष्ट्रात सिंचनासाठी गेल्या काही वर्षांत ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, असे का, असा सवाल ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी विचारला.द इन्स्टिट्यूटशन आॅफ इंजिनिअर्स, इंडियन वॉटर वर्कस असोसिएशन, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, मराठी विद्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी ‘पाणी चांगल्या नोकरीसाठी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी गुजरात राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आर. एस. सोलंकी, संघटनांचे प्रमुख विजय घोगरे, आर. व्ही. सराफ, प्रवीण बोरा, बी. डी. यमगर, मंगेश कश्यप आदी उपस्थित होते.फिरोदिया म्हणाले, की गुजरात राज्यात हे पाण्याचे जाळे उभारण्यासाठी महाराष्ट्रातून जलतज्ज्ञ, अभियंते गेले आणि त्यांच्या कल्पनेतून हे जाळे उभे राहिले. केवळ ५ हजार कोटी रुपयांमध्ये गुजरातच्या सर्व भागांमध्ये पाणी पोहोचले. पण महाराष्ट्रात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही आतापर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले नाही. यामागे केवळ प्रभावी अमंलबजावणीची कमी, हेच एकमेव कारण दिसून येते. गुजरातमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी ही योजना राबविण्याची त्याची अंमलबजावणी करण्याची जबर इच्छाशक्ती होती. त्यातूनच हे शक्य झाले. पण महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी आणि जबर इच्छाशक्तीच नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र आजही पाण्याच्या बाबतीत गुजरातच्या मागे आहे.सोलंकी यांनी गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या जाळ्याची माहिती दिली. ते म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल जावे लागत होते. तरीही पाणी मिळत नव्हते. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत होते. ते रोखण्यासाठी आणि प्रत्येकाला घरी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मोठी योजना हाती घेतली. याअंतर्गत राज्यात सव्वा लाख किलोमीटरचे पाण्याच्या पाइपचे जाळे टाकण्यात आले. शुद्धीकरण, साठवणुकीचे प्रकल्प उभारण्यात आले. त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरासमोर पाण्याचा नळ आला. नर्मदा धरण आणि इतर धरण, सरोवरांच्या माध्यमातून हे पाणी संपूर्ण राज्यात पोहोचविले गेले. आज ८२ टक्के नागरिकांच्या घरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ पोहोचला आहे.