शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष का?

By admin | Updated: March 22, 2016 01:54 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले

पुणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले. त्यासाठी केवळ ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि संपूर्ण गुजरात पाण्याच्या बाबतीत सक्षम झाला. असे असताना महाराष्ट्रात सिंचनासाठी गेल्या काही वर्षांत ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, असे का, असा सवाल ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी विचारला.द इन्स्टिट्यूटशन आॅफ इंजिनिअर्स, इंडियन वॉटर वर्कस असोसिएशन, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, मराठी विद्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी ‘पाणी चांगल्या नोकरीसाठी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी गुजरात राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आर. एस. सोलंकी, संघटनांचे प्रमुख विजय घोगरे, आर. व्ही. सराफ, प्रवीण बोरा, बी. डी. यमगर, मंगेश कश्यप आदी उपस्थित होते.फिरोदिया म्हणाले, की गुजरात राज्यात हे पाण्याचे जाळे उभारण्यासाठी महाराष्ट्रातून जलतज्ज्ञ, अभियंते गेले आणि त्यांच्या कल्पनेतून हे जाळे उभे राहिले. केवळ ५ हजार कोटी रुपयांमध्ये गुजरातच्या सर्व भागांमध्ये पाणी पोहोचले. पण महाराष्ट्रात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही आतापर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले नाही. यामागे केवळ प्रभावी अमंलबजावणीची कमी, हेच एकमेव कारण दिसून येते. गुजरातमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी ही योजना राबविण्याची त्याची अंमलबजावणी करण्याची जबर इच्छाशक्ती होती. त्यातूनच हे शक्य झाले. पण महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी आणि जबर इच्छाशक्तीच नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र आजही पाण्याच्या बाबतीत गुजरातच्या मागे आहे.सोलंकी यांनी गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या जाळ्याची माहिती दिली. ते म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल जावे लागत होते. तरीही पाणी मिळत नव्हते. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत होते. ते रोखण्यासाठी आणि प्रत्येकाला घरी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मोठी योजना हाती घेतली. याअंतर्गत राज्यात सव्वा लाख किलोमीटरचे पाण्याच्या पाइपचे जाळे टाकण्यात आले. शुद्धीकरण, साठवणुकीचे प्रकल्प उभारण्यात आले. त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरासमोर पाण्याचा नळ आला. नर्मदा धरण आणि इतर धरण, सरोवरांच्या माध्यमातून हे पाणी संपूर्ण राज्यात पोहोचविले गेले. आज ८२ टक्के नागरिकांच्या घरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ पोहोचला आहे.