शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आम्ही मेलो काय अन् जगलो काय...?

By admin | Updated: March 13, 2016 01:15 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण सुरुवातीच्या काळात सर्वसोर्इंनीयुक्त असलेल्या या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.

शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण सुरुवातीच्या काळात सर्वसोर्इंनीयुक्त असलेल्या या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या़ वसाहती बकाल झाल्या. या वसाहतींना ‘लोकमत टीम’ने ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करुन समोर आणले ज्वलंत वास्तव.रवीकिरण सासवडे ल्ल बारामतीकुणी आमच्याकडं बघाय येईना... काढ बाबा पडक्या घराचं फोटू... काप्रोरेशनचं काम करता करता हाडाची काडं झाली... नुसतच घर देतू देतू म्हणत्यात... आता ही फुगलेली भिताडं अंगावर पडल्यावरच आम्हाला घर मिळणार का...? आम्ही मेलो काय अन् जगलो काय? कुणाला दखल... अशा शब्दांत लालपुरी येथील शेती महामंडळाच्या वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दहा वर्षांपूर्वी शेती महामंडळ बंद पडल्याने येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली. वालचंदनगर परिसरातील लालपुरी, रत्नपुरी, शिवपुरी, धवलपुरी, अंथुर्णे परिसरातील उखळमाळ आदी परिसरात शेती महामंडळ कामगारांच्या वसाहती आहेत. वसाहतींवरील नोंदीप्रमाणे या खोल्यांचे बांधकाम १९४१ व १९४४ साली झाले आहे. ७५ वर्षांपूर्वीच्या या खोल्यांमध्ये आजही शेकडो कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या ठिकाणी ना पाण्याची सोय, ना स्वच्छतागृहांची. तरीदेखील महामंडळ महिन्याला या कुटुंबांना ७५ ते १५० रुपये भाडे लावत आहे. शेती महामंडळ बंद झाल्यानंतर येथील विजेच्या तारा खांब, विद्युत रोहित्र आदी उपकरणांचा महामंडळाने लिलाव केला. त्यामुळे या कुटुंबांना अंधारातच राहावे लागत आहे. भाडेवसूल करूनही या वसाहतीत कुठल्याच सुविधा नाहीत. कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या या कुटुंबांची उपजीविका रोजंदारीवरच होत आहे. दुष्काळामुळे आता हाताला कामही नाही. त्यामुळे येणारा पैसा हातातोंडाची गाठ घालण्यावरच खर्च होतो. त्यामुळे जागा घेऊन घर बांधणे हे या कामगारांसाठी एक स्वप्नच आहे. मुला-मुलींची शिक्षणं आणि लग्न यासाठी कर्ज काढावी लागत आहेत. इंदापूर शहरात पोलीस कर्मचारी वसाहत, पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत, महावितरण कंपनीची कर्मचारी वसाहत, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत, अश्या शासकीय वसाहती आहेत. सन १९५० ते १९८० या कालावधीत त्यांची बांधकामे झाली आहेत. पाटबंधारे विभागाची वसाहत ही सर्वात मोठी आहे. त्या खालोखाल महावितरण कंपनी, पोलीस कर्मचारी वसाहतींचा क्रमांक लागतो. पाटबंधारे विभागाच्या परिसरात आगंतुकपणे घुसखोरी केलेल्या तालुका कृषी कार्यालयासह भीमा पाटबंधारे विभाग, खडकवासला कालवा विभाग, जलविद्युत प्रकल्प अशी शासकीय कार्यालये आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशी होतील एवढीच निवासस्थाने सन १९८० च्या दशकात तेथे बांधण्यात आली. त्यामध्ये ५९ कायमस्वरुपी निवासस्थाने व ४४ पत्राचाळींचा समावेश होता. सन १९९५ पर्यंत पाटबंधारे खात्याकडे भरपूर कामे होती. कालांतराने ती कमी होत गेली. पाटबंधारे वसाहतीत एकूण १०३ घरांपैकी २८ घरांची पडझड झाली आहे. उपविभागाचे १३ व खडकवासला इंदापूर शाखेचे २८ अश्या ४१ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १५ जणांची वसाहतीत रहाण्याची सोय झाली आहे. सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बऱ्याच वर्षांपासून रिक्त करण्यात आली नाही. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळा शिकता आली नाही. शेतीच्या कामाव्यतिरिक्त आम्हाला दुसरे कामही येत नाही. सध्या शेतातच काम नाही. मिळेल त्या मजुरीतून घर खर्च भागवावा लागतो. मग आम्ही घर कसं बांधणार? कर्ज काढावी म्हणलीतर आमच्याकडे काहीच नसल्याने कर्जासाठी कोणी दारात उभे करत नाही.- सचिन सूर्यवंशी, शेती महांडळ कामगार, लालपुरीघरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळा शिकता आली नाही. शेतीच्या कामाव्यतिरिक्त आम्हाला दुसरे कामही येत नाही. सध्या शेतातच काम नाही. मिळेल त्या मजुरीतून घर खर्च भागवावा लागतो. मग आम्ही घर कसं बांधणार? कर्ज काढावी म्हणलीतर आमच्याकडे काहीच नसल्याने कर्जासाठी कोणी दारात उभे करत नाही.- सचिन सूर्यवंशी, शेती महांडळ कामगार, लालपुरीमाझा पाय मोडला, उपचारासाठी पैसे नाहीत. शेजाऱ्यांनी वर्गणी करून प्राथमिक उपचार केले. जगण्यासाठीही पेन्शन मिळत नाही. वय झाल्याने कुठे कामालाही जाऊ शकत नाही. मग घर कस आणि कोठून बांधणार? ५ रुपये हजरी पासून काम केले. २० वर्षेकाम करूनही तृतीय दर्जाचे कर्मचारी म्हणूनच ठेवले. हातात पैसाच नाही, त्यामुळे घर नाही. - तान्हूबाई मंडले, शेती महांडळ कामगार