शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

मराठा उमेदवारांचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मराठा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यासाठीचे नव्हते. मराठा आरक्षणाच्या ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मराठा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यासाठीचे नव्हते. मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार लावण्यात आलेल्या निकालात एसईबीसी वगळून आयोगाने निकाल सादर करणे अपेक्षित आहे का, यावर न्यायालयाचे मार्गदर्शन व अंतरिम आदेश मिळवण्यासाठी एमपीएससीने ऑक्टोबर २०२० मध्येच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आयोगातील सूत्रांनी असा दावा ‘लोकमत’शी बोलताना केला.

न्यायालयाने ९ सप्टेंबरला दिलेल्या निकालात आरक्षणाबाबत स्पष्टता नव्हती. एमपीएससीने मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार २०१९ पर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल लावले. कायद्याला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीने निवड यादी सादर करताना एसईबीसीचे आरक्षण वगळून सुधारित निकाल सादर करणे अपेक्षित आहे का? यावर न्यायालयाकडून अंतरिम आदेशाची मागणी केली होती. दरम्यान, मराठा समाजातील नेत्यांनी आणि मराठा संघटनांनी टीकेची झोड उठवल्यानंतर एमपीएससीने न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र माघारी घेतले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ज्या उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यांना आता २३ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार ईडब्लूएस किंवा खुला यातून आरक्षण घेता येऊ शकणार आहे. त्यामुळे एमपीएससीने ज्याबाबत अंतरिम आदेशाची मागणी केली होती. ती मागणीच संपुष्टात आली. त्यामुळे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला काहीही अर्थ राहिलेला नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

एमपीएससीला नियुक्ती देण्याचा अधिकार नाही. एमपीएससी शासनकडून रिक्त जागांच्या मागणीपत्राची मागणी करते. जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविते. अंतिम यादी तयार करून केवळ संबंधित पदांसाठी उमेदवाराची निवड करून ती यादी राज्य शासनाला सादर करते. त्यामुळे निवड प्रक्रिया राबविण्यापर्यंतचे अधिकार एमपीएससीला आहेत. नियुक्तीचे सर्व अधिकार राज्यसरकारला असून यात एमपीएससी हस्तक्षेप करीत नाही, असा खुलासा एमपीएससीतल्या सूत्रांनी केला.

राज्य सरकारकडून दिरंगाई?

एमपीएससीने २०१९ पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे अंतिम निकाल लावून राज्य सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे नियुक्ती देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच आहेत. एमपीएससीला नाहीत, याकडेही आयोगातील सूत्रांनी लक्ष वेधले. त्यामुळे या प्रकरणी महाआघाडी सरकार विलंब लावत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

टांगती तलवार कायम

एमपीएससीकडून २०२० नंतर ज्या नियोजित परीक्षा घेण्यात येणार होत्या किंवा येणार आहेत त्यावर न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मराठा आरक्षणाचा विचार करता पुढील परीक्षांना मराठा आरक्षण ग्राह्य धरावे किंवा कसे, यावर न्यायालयातून अंतरिम आदेश मागविण्यासाठी दाखल केलेली याचिका नसून केवळ प्रतिज्ञापत्र आहे, असे आयोगातील सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे मराठा उमेदवारांच्या भवितव्यावरची टांगती तलवार कायम राहिली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात भूमिका घेतली पाहिजे यात आयोगाचा संबंध नाही, असे सूत्रांनी सांगितले.