शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जातीधर्माने खच्ची झालेले असताना आत्मनिर्भरता कसली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत माणूस उभा तरी कसा राहणार,” असा सवाल कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला.

सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.१३) सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात डॉ. आढाव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आढाव बोलत होते. गजानन खातू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुभाष वारे यावेळी उपस्थित होते. डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार शामसुंदर सोन्नर (परळी), एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वर्षा विद्या विलास (मुंबई) व सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पौर्णिमा मेहेर (पालघर) यांना देण्यात आला.

डॉ. आढाव यांनी वाढत्या सामाजिक विषमतेबद्दल खंत व्यक्त केली. जगात असा एकही देश नाही? जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही चुकत नाही. ते त्यांच्या तत्त्वानुसार वागतात. राममंदिरासाठी घरोघर फिरतात, आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी असे फिरणार आहोत की नाही? फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत राहू नका, तर सक्रिय व्हा, तळातील लोकांबरोबर, त्यांच्या भाषेत बोला. संवाद साधण्याचे तंत्र आत्मसात करा, असे आढाव म्हणाले.

खातू म्हणाले, “पाणी खराब झाले आहे, मात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे ते स्वच्छ होते, नव्या पिढीने आता आपणच आपले नेतृत्व करायला शिकावे” सर्व पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कामाची माहिती देणाऱ्या मानपत्राचे लेखन सुभाष वारे यांनी केले. त्याचे वाचन इब्राहीम खान, ओंकार मोरे व पौर्णिमा यांनी केले. महात्मा फुले यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जाकीर अत्तार यांनी सूत्रसंचालन केले.