शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जातीधर्माने खच्ची झालेले असताना आत्मनिर्भरता कसली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “जातीधर्माने माणसांचे जीवन खच्ची होत असताना पंतप्रधान कसली आत्मनिर्भरता म्हणतात, त्यांनाच माहीत! अशा परिस्थितीत माणूस उभा तरी कसा राहणार,” असा सवाल कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला.

सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.१३) सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात डॉ. आढाव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आढाव बोलत होते. गजानन खातू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुभाष वारे यावेळी उपस्थित होते. डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार शामसुंदर सोन्नर (परळी), एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वर्षा विद्या विलास (मुंबई) व सामाजिक कृतज्ञता पुरस्कार पौर्णिमा मेहेर (पालघर) यांना देण्यात आला.

डॉ. आढाव यांनी वाढत्या सामाजिक विषमतेबद्दल खंत व्यक्त केली. जगात असा एकही देश नाही? जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही चुकत नाही. ते त्यांच्या तत्त्वानुसार वागतात. राममंदिरासाठी घरोघर फिरतात, आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी असे फिरणार आहोत की नाही? फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत राहू नका, तर सक्रिय व्हा, तळातील लोकांबरोबर, त्यांच्या भाषेत बोला. संवाद साधण्याचे तंत्र आत्मसात करा, असे आढाव म्हणाले.

खातू म्हणाले, “पाणी खराब झाले आहे, मात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे ते स्वच्छ होते, नव्या पिढीने आता आपणच आपले नेतृत्व करायला शिकावे” सर्व पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कामाची माहिती देणाऱ्या मानपत्राचे लेखन सुभाष वारे यांनी केले. त्याचे वाचन इब्राहीम खान, ओंकार मोरे व पौर्णिमा यांनी केले. महात्मा फुले यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जाकीर अत्तार यांनी सूत्रसंचालन केले.