शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

राहूबेट भारनियमनाने त्रस्त

By admin | Updated: May 4, 2017 01:49 IST

राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून

पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात रात्री-अपरात्री होत असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या लपंडावाने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला असून, सद्य:स्थितीत ‘पाणी उशाला, परंतु कोरड घशाला’ याप्रमाणे भीमा आणि मुळा-मुठा या दोन्ही नद्या पाण्याने भरून वाहत असूनदेखील हिरवीगार उभी पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी महावितरणकडून या संदर्भात उपाययोजना करण्यासाठीची मागणी शेतकरी करीत आहे.राहूबेट परिसरातील पाटेठाण, पिलाणवाडी, कोरेगाव भिवर, देवकरवाडी, खामगाव, वाळकी, वडगाव बांडे,पानवली, राहू, डुबेवाडी, टेळेवाडी, मिरवडी, मेमाणवाडी,टाकळी भीमा, उडंवडी, पिंपळगाव आदी गावांत कृषी विद्युत पंपांना सध्या महावितरणकडून भारनियमन कालावधीत आठ तास वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजेपर्यंत हुलकावनी देत आहे. तोपर्यंत शेतकरीवर्गाला ताटकळत वाट पाहण्याची वेळ येत आहे. तसेच, लाइट आल्यानंतरदेखील तासन्तास सारखाच लपंडाव सुरू असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे आठ तास मिळणारी वीज जेमतेम पाच तासांवर आली आहे. परिणामी रात्री उशिरापर्यंत जागृत राहून पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यातच उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागत असल्याने सध्या तरकारी सारखी पिके देखील पाण्याअभावी सुकून जात आहे. नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध असूनदेखील केवळ विजेच्या वेळीअवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे उसाची उभी हिरवीगार पिके जळून चालली आहेत. परिणामी होत असलेल्या विजेच्या भारनियमनाबाबतीत महावितरणकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)भारनियमन रात्री-अपरात्री होत असून, रात्री साडेदहाला येणारी लाइट साडेबारा-एक वाजता येत आहे. आल्यानंतरदेखील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, रात्री जागूनदेखील पिके पाण्या अभावी जळून चालली आहेत. - सत्यवान वडघुले, शेतकरी पाटेठाण सद्य:स्थितीत संपूर्ण राज्यातच विजेच्याबाबतीत मागणी जास्त व पुरवठा कमी होत असून, काही तांत्रिक अडचणींमुळे तातडीचे भारनियमन करावे लागत असून वारंवार खंडित होत असलेल्या उपकेंद्राची तत्काळ पाहणी करण्यात येऊन उपाय योजण्यात येतील.- डी. एन. भोळे, कार्यकारी अभियंता, केडगाव विभाग