शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आठवडे बाजाराने कोंडी

By admin | Updated: January 9, 2017 03:03 IST

येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या

थेरगांव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो़. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीने वाहनचालक आणि येथील नागरिक त्रस्त झाले आहेत़डांगे चौकातून औंध-रावेत आणि चिंचवड - हिंजवडी असे जातात. पुणे -मुंबई महामार्ग आणि हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतुक कोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत़ हा वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ च आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक ांबरोबरचशेजारील गावांमधून ट्रक, टेम्पो भरून नागरीक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण जाणवते. व्यवसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजी पाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले तर हा वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो़ त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत़ डांगे चौकातील रस्ते हे अधिकृत पार्किंग आणि पथारी व्यावसायिकांसाठीच उभारले असल्याचा भास होतो़ आयटी हब, शैैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे व शहरात जाणारा औंध रस्ता आणि एका दिशेला पिंपरी-चिंचवडकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळण- वळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे येथील वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना अपेक्षित आहे. वाहतूक पोलीस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडतो़ ही वाहतुक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन करायला हवे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत़ (वार्ताहर)