शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी बचती’च्या शपथा गेल्या वाहून

By admin | Updated: August 10, 2016 01:38 IST

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची

अंथुर्णे : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र यंदा धरणक्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे नीरा डावा कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले आहे. कालव्याचे पाणी ओढे, नाल्यांमध्ये पाझरून येत आहे. टंचाईच्या दिवसांमध्ये गावागावांत घेतलेल्या ‘पाणी बचती’च्या शपथा केव्हाच वाया जाणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. हे पाणी साठवण्यासाठी व जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामस्थांसह मुक्या जनावरांचे पाण्यासाठी अतोनात हाल झाले. परिस्थिती बदलली. इंदापूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात तर तालुक्याबाहेर जास्त प्रमाणावर पाऊस पडल्याचा या परिसराला फायदा झाला. पाणीटंचाई कमी झाली. पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे जनावरांना गवत उपलब्ध झाले. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रशासन वाया जाणाऱ्या पाण्याबाबत उदासीन झाले आहे. परिणामी ओढे-नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. पाण्याचे महत्त्व तुर्तास तरी कुणास पटत नसल्याचेच या दिसून येत आहे. एप्रिल मे महिन्यात तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असतो, पाणी मिळविण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. मोठ्या प्रमाणवर पैशाचा अपव्यव केला जातो. प्रसंगी पैसे देऊनही वेळेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्या वेळी मात्र पाण्यासाठी दाही दिशा होते. (वार्ताहर)