शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

‘पाणी बचती’च्या शपथा गेल्या वाहून

By admin | Updated: August 10, 2016 01:38 IST

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची

अंथुर्णे : दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेती आणि जनावरांची तहान भागवत असताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र यंदा धरणक्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे नीरा डावा कालव्याला शेतीसाठी आवर्तन सुटले आहे. कालव्याचे पाणी ओढे, नाल्यांमध्ये पाझरून येत आहे. टंचाईच्या दिवसांमध्ये गावागावांत घेतलेल्या ‘पाणी बचती’च्या शपथा केव्हाच वाया जाणाऱ्या पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. हे पाणी साठवण्यासाठी व जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामस्थांसह मुक्या जनावरांचे पाण्यासाठी अतोनात हाल झाले. परिस्थिती बदलली. इंदापूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात तर तालुक्याबाहेर जास्त प्रमाणावर पाऊस पडल्याचा या परिसराला फायदा झाला. पाणीटंचाई कमी झाली. पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे जनावरांना गवत उपलब्ध झाले. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रशासन वाया जाणाऱ्या पाण्याबाबत उदासीन झाले आहे. परिणामी ओढे-नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. पाण्याचे महत्त्व तुर्तास तरी कुणास पटत नसल्याचेच या दिसून येत आहे. एप्रिल मे महिन्यात तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असतो, पाणी मिळविण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. मोठ्या प्रमाणवर पैशाचा अपव्यव केला जातो. प्रसंगी पैसे देऊनही वेळेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्या वेळी मात्र पाण्यासाठी दाही दिशा होते. (वार्ताहर)