शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोदीप्रणित फॅसिझममधून देश मुक्त करायचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक ...

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक होत्या. सध्याचा संघर्ष हा मोदीप्रणित फॅसिझम विरोधातला आहे. गेल्या सात-आठ वर्षांत मोदी-शहांनी प्रशासन, राजकारणावर कब्जा मिळवला. त्यामुळे राजकारणाचा पोतच बदलला आहे. आपल्याला देश फॅसिझममुक्त करून पुन्हा लोकशाही प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी भाषिक चळवळी, समूहांनी एकत्र येऊन प्रशासकीय हक्कांसाठी लढले पाहिजे,” असे मत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केतकर बोलत होते. यावेळी परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव-सामंत, विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर, उज्ज्वला वाघोले तसेच अन्य विश्वस्त उपस्थित होते. यावेळी दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्राचार्य चंद्रकांत केळकर लिखित ‘जागतिक अर्थव्यवस्थेपुढील पेच’, डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ आणि कॉ. भालचंद्र कानगो लिखित ‘महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अन्नपूर्णा परिवाराच्या ‘संवाद’ या त्रैमासिकाचे प्रकाशन यावेळी झाले. वृषाली मगदूम यांनी संपादक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंद मेणसे लिखित ‘संघर्ष : महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचेही प्रकाशनही झाले.

केतकर म्हणाले, “आताच्या पिढीमध्ये चळवळीबाबत तीव्रता जाणवत नाही. हुतात्म्यांबद्दल आस्था दिसत नाही. अपवाद वगळता संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा विषय प्रबंधासाठी घेतलेला नाही. माहितीचे स्रोत कमी झाल्याने पुढील पिढ्यांना फारशी माहिती मिळत नाही. चळवळींचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक आहे.”

डॉ. मेणसे म्हणाले, “कर्नाटकातील मराठी माणसाचा संघर्ष तीन पिढ्यांपासून चालत आला आहे. आम्हाला महाराष्ट्रात विलीन करावे, एवढीच आमची मागणी आहे. हा लढा सनदशीर पद्धतीने, गांधीवादी मार्गाने आजवर पुढे आला. सध्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संघर्षाची पार्श्वभूमी पुढील पिढ्यांना समजणे आवश्यक आहे.” उज्ज्वला वाघोले यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर यांनी आभार मानले.