शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
3
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
4
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
7
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
8
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
9
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
10
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
11
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
12
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
13
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
14
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
15
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
16
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
17
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
18
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
19
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
20
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
Daily Top 2Weekly Top 5

मोदीप्रणित फॅसिझममधून देश मुक्त करायचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक ...

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक होत्या. सध्याचा संघर्ष हा मोदीप्रणित फॅसिझम विरोधातला आहे. गेल्या सात-आठ वर्षांत मोदी-शहांनी प्रशासन, राजकारणावर कब्जा मिळवला. त्यामुळे राजकारणाचा पोतच बदलला आहे. आपल्याला देश फॅसिझममुक्त करून पुन्हा लोकशाही प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी भाषिक चळवळी, समूहांनी एकत्र येऊन प्रशासकीय हक्कांसाठी लढले पाहिजे,” असे मत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केतकर बोलत होते. यावेळी परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव-सामंत, विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर, उज्ज्वला वाघोले तसेच अन्य विश्वस्त उपस्थित होते. यावेळी दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्राचार्य चंद्रकांत केळकर लिखित ‘जागतिक अर्थव्यवस्थेपुढील पेच’, डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ आणि कॉ. भालचंद्र कानगो लिखित ‘महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अन्नपूर्णा परिवाराच्या ‘संवाद’ या त्रैमासिकाचे प्रकाशन यावेळी झाले. वृषाली मगदूम यांनी संपादक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंद मेणसे लिखित ‘संघर्ष : महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचेही प्रकाशनही झाले.

केतकर म्हणाले, “आताच्या पिढीमध्ये चळवळीबाबत तीव्रता जाणवत नाही. हुतात्म्यांबद्दल आस्था दिसत नाही. अपवाद वगळता संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा विषय प्रबंधासाठी घेतलेला नाही. माहितीचे स्रोत कमी झाल्याने पुढील पिढ्यांना फारशी माहिती मिळत नाही. चळवळींचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक आहे.”

डॉ. मेणसे म्हणाले, “कर्नाटकातील मराठी माणसाचा संघर्ष तीन पिढ्यांपासून चालत आला आहे. आम्हाला महाराष्ट्रात विलीन करावे, एवढीच आमची मागणी आहे. हा लढा सनदशीर पद्धतीने, गांधीवादी मार्गाने आजवर पुढे आला. सध्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संघर्षाची पार्श्वभूमी पुढील पिढ्यांना समजणे आवश्यक आहे.” उज्ज्वला वाघोले यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर यांनी आभार मानले.