शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोदीप्रणित फॅसिझममधून देश मुक्त करायचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक ...

कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक होत्या. सध्याचा संघर्ष हा मोदीप्रणित फॅसिझम विरोधातला आहे. गेल्या सात-आठ वर्षांत मोदी-शहांनी प्रशासन, राजकारणावर कब्जा मिळवला. त्यामुळे राजकारणाचा पोतच बदलला आहे. आपल्याला देश फॅसिझममुक्त करून पुन्हा लोकशाही प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी भाषिक चळवळी, समूहांनी एकत्र येऊन प्रशासकीय हक्कांसाठी लढले पाहिजे,” असे मत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केतकर बोलत होते. यावेळी परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव-सामंत, विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर, उज्ज्वला वाघोले तसेच अन्य विश्वस्त उपस्थित होते. यावेळी दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्राचार्य चंद्रकांत केळकर लिखित ‘जागतिक अर्थव्यवस्थेपुढील पेच’, डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ आणि कॉ. भालचंद्र कानगो लिखित ‘महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अन्नपूर्णा परिवाराच्या ‘संवाद’ या त्रैमासिकाचे प्रकाशन यावेळी झाले. वृषाली मगदूम यांनी संपादक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंद मेणसे लिखित ‘संघर्ष : महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचेही प्रकाशनही झाले.

केतकर म्हणाले, “आताच्या पिढीमध्ये चळवळीबाबत तीव्रता जाणवत नाही. हुतात्म्यांबद्दल आस्था दिसत नाही. अपवाद वगळता संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा विषय प्रबंधासाठी घेतलेला नाही. माहितीचे स्रोत कमी झाल्याने पुढील पिढ्यांना फारशी माहिती मिळत नाही. चळवळींचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक आहे.”

डॉ. मेणसे म्हणाले, “कर्नाटकातील मराठी माणसाचा संघर्ष तीन पिढ्यांपासून चालत आला आहे. आम्हाला महाराष्ट्रात विलीन करावे, एवढीच आमची मागणी आहे. हा लढा सनदशीर पद्धतीने, गांधीवादी मार्गाने आजवर पुढे आला. सध्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संघर्षाची पार्श्वभूमी पुढील पिढ्यांना समजणे आवश्यक आहे.” उज्ज्वला वाघोले यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर यांनी आभार मानले.