शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जलसाठ्यांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:45 IST

पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांनी व पाण्याच्या साठ्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच तळ गाठले आहेत. यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना लवकरच दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाण्यासाठी या परिसरात टँकरची मागणी वाढू लागली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे परिसर मुसळधार पडणाºया पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत या भागामध्ये पडणाºया मुसळधार पावसामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या कूपनलिकांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी जनता दुष्काळाचे हाल सोसत आहे. पावसाळ्यामध्ये भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयामध्ये मुसळधार पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्यासाठी या भागातील आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण (आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाºया श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरातील गावांना लवकरच पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे तसतशा उन्हाळ्याच्या झळा या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील आदिवासी बांधवांना तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. दरवर्षी या भागातील आदिवासी जनतेला एप्रिल, मे महिन्यामध्ये दुष्काळाशी सामना करावा लागत होता; परंतु यंदा याआधीच पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. डिंभे धरण आदिवासी भागाच्या उशाला असून कित्येक वर्षे आदिवासी जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. या भागात असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडित बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत जानेवारी महिन्यातच आटू लागून तळ गाठू लागली आहेत. हे जलस्रोत या भागामध्ये जीवनदायी ठरत असल्याने ते आटू लागल्यामुळे पुढील काळासाठी आदिवासी बांधवांपुढे दुष्काळाविषयी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील जनतेबरोबरच जित्राबांनाही या दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई