शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जलसाठ्यांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:45 IST

पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतेय पायपीट

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांनी व पाण्याच्या साठ्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच तळ गाठले आहेत. यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना लवकरच दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. पाण्यासाठी या परिसरात टँकरची मागणी वाढू लागली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे परिसर मुसळधार पडणाºया पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत या भागामध्ये पडणाºया मुसळधार पावसामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या कूपनलिकांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी जनता दुष्काळाचे हाल सोसत आहे. पावसाळ्यामध्ये भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयामध्ये मुसळधार पाऊस पडतो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्यासाठी या भागातील आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण (आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाºया श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरातील गावांना लवकरच पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे तसतशा उन्हाळ्याच्या झळा या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील आदिवासी बांधवांना तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. दरवर्षी या भागातील आदिवासी जनतेला एप्रिल, मे महिन्यामध्ये दुष्काळाशी सामना करावा लागत होता; परंतु यंदा याआधीच पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. डिंभे धरण आदिवासी भागाच्या उशाला असून कित्येक वर्षे आदिवासी जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. या भागात असणाºया विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडित बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत जानेवारी महिन्यातच आटू लागून तळ गाठू लागली आहेत. हे जलस्रोत या भागामध्ये जीवनदायी ठरत असल्याने ते आटू लागल्यामुळे पुढील काळासाठी आदिवासी बांधवांपुढे दुष्काळाविषयी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील जनतेबरोबरच जित्राबांनाही या दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई