शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.

लोणी देवकर  :  सध्या  उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.  काही ठिकाणी मोठय़ा  प्रमाणात जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी धरणातील पाणी दूषित झाले आहे.  हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. 
दूषित उजनी जलाशयाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.  उजनी धरणघवरील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे उजनी काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच या  पाण्यावर अवलंबून असणा:या पुणो, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणा:या शेतावर विपरित परिणाम झाला आहे. काठावरील शेतीचे उत्पादनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी रासायनिक खताचा वारेमाप वापर करून कसेबसे शेतीचे उत्पादन वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 
मात्र, आणखी काही वर्षात ही संपूर्ण शेती नापीक होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या  पाणी प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणणो गरजेचे बनले आहे. या परिसरातील पशूपक्षी यांच्या आरोग्यावरदेखील प्रदूषित पाण्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उजनीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील काही दिवसांतच घडली होती. सध्या देखील  उजनीतील जलचरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबाबत अहवाल शासनास सादर केले आहेत. अनेक कंपन्या प्रदूषित पाणी नदीपात्रत सोडून देत आहेत.  सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ कागदावरच सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कागदावरच अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही.  
पाणी प्रदूषण रोखण्याऐवजी दररोज वाढतच आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी व संवर्धनासाठी नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2क् राज्यांतील 38 नद्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ चारच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये राज्यातील मोठय़ा नदीचा म्हणजे भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. 
सध्या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हे पाणी अगदी शेतीलाही दिले तरी पिकावर परिणाम होत आहे. उत्पादन घटले आहे. शेतीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे जमिनीवर पांढ:या रंगाचा थर जमा होत आहे. (वार्ताहर)