शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.

लोणी देवकर  :  सध्या  उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.  काही ठिकाणी मोठय़ा  प्रमाणात जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी धरणातील पाणी दूषित झाले आहे.  हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. 
दूषित उजनी जलाशयाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.  उजनी धरणघवरील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे उजनी काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच या  पाण्यावर अवलंबून असणा:या पुणो, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणा:या शेतावर विपरित परिणाम झाला आहे. काठावरील शेतीचे उत्पादनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी रासायनिक खताचा वारेमाप वापर करून कसेबसे शेतीचे उत्पादन वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 
मात्र, आणखी काही वर्षात ही संपूर्ण शेती नापीक होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या  पाणी प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणणो गरजेचे बनले आहे. या परिसरातील पशूपक्षी यांच्या आरोग्यावरदेखील प्रदूषित पाण्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उजनीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील काही दिवसांतच घडली होती. सध्या देखील  उजनीतील जलचरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबाबत अहवाल शासनास सादर केले आहेत. अनेक कंपन्या प्रदूषित पाणी नदीपात्रत सोडून देत आहेत.  सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ कागदावरच सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कागदावरच अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही.  
पाणी प्रदूषण रोखण्याऐवजी दररोज वाढतच आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी व संवर्धनासाठी नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2क् राज्यांतील 38 नद्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ चारच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये राज्यातील मोठय़ा नदीचा म्हणजे भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. 
सध्या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हे पाणी अगदी शेतीलाही दिले तरी पिकावर परिणाम होत आहे. उत्पादन घटले आहे. शेतीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे जमिनीवर पांढ:या रंगाचा थर जमा होत आहे. (वार्ताहर)