शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भीमा नदीत जलपर्णी कुजली; जलचर धोक्यात

By admin | Updated: January 31, 2015 22:49 IST

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत.

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी पाण्यात कुजल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे हे पाणी वापरण्याऐवजी ते फिल्टरचे पाणी वापरत आहेत. भीमा नदीवर पारगाव, सादलगाव, मांडवगण या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात पाणी अडविले आहे. नदीपात्रात येथील कारखान्याचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पाणी दूषित झाले आहे. याचा परिणाम सर्व बंधाऱ्यांध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मांडवगण फराटा तसेच कानगाव बंधाऱ्यातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भीमा नदीमध्ये सध्या पुणे व पिंपरी-चिचंवड महापालिकांचे दूषित केमिकलयुक्त पाणी व त्यात आता भीमा-पाटस कारखान्याची मळी व रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याबरोबरच या कारखान्यातील मळीही पाण्यात टाकली जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. (वार्ताहर)४मांडवगण फराटा (ता. शिरूर)- कानगाव (ता. दौंड) बंधाऱ्याच्या खालील बाजूला पाण्यात मासेमारीचा व्यवसाय चालतो. जलपर्णीमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज येथील मच्छीमारांनी व्यक्त केली. या ठिकाणी ६० ते ७० कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत आहे. येथून दररोज माशांची विक्री होत आहे; परंतु मळीमिश्रित व रसायनयुक्त पाण्यामुळे लहानमोठे मासे मेल्याने हा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.४ सोसायटी चौकाजवळ ७ ते ८ लहान मुंलाना कांजण्या आल्या आहे. सायंकाळी ५ पासून व सकाळी ६ वाजेपर्यंत डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दूषित पाणी अघोंळ वा कपडे धुण्यासाठी योग्य नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.