शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

‘पवने’चे पाणी पुन्हा पेटणार

By admin | Updated: May 3, 2016 03:29 IST

पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा

पवनानगर : पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन छेडून पिंपरी-चिंचवडसाठी पवना नदीतून एकही थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.पवना धरणाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतका कमी पाणीसाठा आहे. मात्र, तो इतकाही कमी नाही की, ज्यामुळे शेतीचे पाणी अडवणे गरजेचे आहे. या वर्षी पवना धरणात २५ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर उपयुक्त साठा ६०.४५ घनमीटर इतका आहे. सध्याची पाणी पातळी १९७६.८० फूट इतकी आहे. याचा विचार करून मागील वर्षी ३० एप्रिलअखेर पवना धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता, तर पाणी पातळी १९८६.६० इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे. १० फूट इतकी पाणी पातळी कमी आहे.याचा विचार करता शिल्लक पाणीसाठा हा किमान दोन महिने पुरू शकतो. सध्या धरणातून १२०० क्युसेकने सहा तास पाणी सोडले जात आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला पिण्यासाठी वापरले जाते. शेतकरीदेखील पाणी वापरत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक शेतीचे पाणी बंद करत असून, त्याला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पवनेचे पाणी पुन्हा पेटणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली जावी व मेअखेर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जावे, यावर शेतकरी ठाम आहेत. पवना धरणात सध्या पुरेसे पाणी आहे. पाणीकपात करून पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी व पवना मावळच्या शेतीला पाणी देणे शक्य आहे. सध्याचा २५ टक्के पाणीसाठा असाच विसर्ग सुरू ठेवल्यास जूनअखेर पुरेल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने निर्णय बदलावा अन्यथा शेतीचे मोठे नुकसान होईल व शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. यामुळे पाणी बंद केल्यास आम्ही पिंपरी-चिंचवडला पाण्याचा एक थेंब देखील पाणी जाऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू.- पांडुरंग ठाकर संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखानाआम्ही पाणी बंद करू देणार नाही. प्रथम प्रशासनाने पाणीकपात करावी. वाया जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणावेत. पाणी बंदचा विचार केल्यास तीव्र आंदोलन करून नदीतून एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही.- काशिनाथ ढोरे, अध्यक्ष, किसान आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसधरणाचे पाणी हे प्रथम शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. महावितरणला सांगून पाणी बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. पाणी बंद केले तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू व शहराला पाणी जाऊ देणार नाही.- यशवंत मोहळ, तालुका कार्याध्यक्ष, काँग्रेसपाणी हे प्रथम शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही. मात्र,पाणीकपात करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहिजे. शेतीचे पाणी बंद केले, तर शिवसेना पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी इकडे फिरकू देणार नाही. पाणीकपात करून सर्वांना पाणी मिळावे.- सुरेश गुप्ता, शिवसेना शहरप्रमुखसध्या धरणात पुरेसे पाणी आहे. पाणी बंद करू नये. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभे केले आहेत. पाणी बंद केले तर रोपे मरून जातील. शेतकरी एवढे कर्ज कसे फेडणार? पाणी बंद झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. याचा विचार करून निर्णय घ्यावा.- मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फुलउत्पादक संघशेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी बंद करून शासनअन्याय करीत आहे. तो सहन करणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून धरणावर शेतकऱ्यांचा ताबा ठेवेल. पाणी बंद करण्याऐवजी पाणीकपात करा. पिंपरी-चिंचवड व मावळवासीयांना समान न्याय द्या. पाणी बंद करायचे असेल, तर शेतीचा पंचनामा करून त्यांना पूर्ण भरपाई द्या, मगच पाण्याचा निर्णय घ्या.- महादेव कालेकर, माजी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना