शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘पवने’चे पाणी पुन्हा पेटणार

By admin | Updated: May 3, 2016 03:29 IST

पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा

पवनानगर : पवना धरणाचे पाणी शेतीसाठी बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतीचे पाणी अडवले, तर पवना बंद जलवाहिनीच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन छेडून पिंपरी-चिंचवडसाठी पवना नदीतून एकही थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.पवना धरणाच्या ४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतका कमी पाणीसाठा आहे. मात्र, तो इतकाही कमी नाही की, ज्यामुळे शेतीचे पाणी अडवणे गरजेचे आहे. या वर्षी पवना धरणात २५ टक्के इतका पाणीसाठा आहे, तर उपयुक्त साठा ६०.४५ घनमीटर इतका आहे. सध्याची पाणी पातळी १९७६.८० फूट इतकी आहे. याचा विचार करून मागील वर्षी ३० एप्रिलअखेर पवना धरणात ४१ टक्के पाणीसाठा होता, तर पाणी पातळी १९८६.६० इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे. १० फूट इतकी पाणी पातळी कमी आहे.याचा विचार करता शिल्लक पाणीसाठा हा किमान दोन महिने पुरू शकतो. सध्या धरणातून १२०० क्युसेकने सहा तास पाणी सोडले जात आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला पिण्यासाठी वापरले जाते. शेतकरीदेखील पाणी वापरत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक शेतीचे पाणी बंद करत असून, त्याला शेतकऱ्यांसह सर्वच राजकीय संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पवनेचे पाणी पुन्हा पेटणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली जावी व मेअखेर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जावे, यावर शेतकरी ठाम आहेत. पवना धरणात सध्या पुरेसे पाणी आहे. पाणीकपात करून पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी व पवना मावळच्या शेतीला पाणी देणे शक्य आहे. सध्याचा २५ टक्के पाणीसाठा असाच विसर्ग सुरू ठेवल्यास जूनअखेर पुरेल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने निर्णय बदलावा अन्यथा शेतीचे मोठे नुकसान होईल व शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. यामुळे पाणी बंद केल्यास आम्ही पिंपरी-चिंचवडला पाण्याचा एक थेंब देखील पाणी जाऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू.- पांडुरंग ठाकर संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखानाआम्ही पाणी बंद करू देणार नाही. प्रथम प्रशासनाने पाणीकपात करावी. वाया जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणावेत. पाणी बंदचा विचार केल्यास तीव्र आंदोलन करून नदीतून एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही.- काशिनाथ ढोरे, अध्यक्ष, किसान आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसधरणाचे पाणी हे प्रथम शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. महावितरणला सांगून पाणी बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. पाणी बंद केले तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू व शहराला पाणी जाऊ देणार नाही.- यशवंत मोहळ, तालुका कार्याध्यक्ष, काँग्रेसपाणी हे प्रथम शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही. मात्र,पाणीकपात करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलेच पाहिजे. शेतीचे पाणी बंद केले, तर शिवसेना पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी इकडे फिरकू देणार नाही. पाणीकपात करून सर्वांना पाणी मिळावे.- सुरेश गुप्ता, शिवसेना शहरप्रमुखसध्या धरणात पुरेसे पाणी आहे. पाणी बंद करू नये. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभे केले आहेत. पाणी बंद केले तर रोपे मरून जातील. शेतकरी एवढे कर्ज कसे फेडणार? पाणी बंद झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. याचा विचार करून निर्णय घ्यावा.- मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फुलउत्पादक संघशेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी बंद करून शासनअन्याय करीत आहे. तो सहन करणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून धरणावर शेतकऱ्यांचा ताबा ठेवेल. पाणी बंद करण्याऐवजी पाणीकपात करा. पिंपरी-चिंचवड व मावळवासीयांना समान न्याय द्या. पाणी बंद करायचे असेल, तर शेतीचा पंचनामा करून त्यांना पूर्ण भरपाई द्या, मगच पाण्याचा निर्णय घ्या.- महादेव कालेकर, माजी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना