शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

भीमा नदीकाठी पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 13, 2016 03:24 IST

राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली

कोरेगाव भीमा : राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली तालुक्यात मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पूर्वी भीमा नदीकाठच्या गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. नदीमध्ये खड्डे खोदून झरे तयार करून या झऱ्यांमधून हंड्यात पाणी भरून घरी आणावे लागत असे. १९९४ साली चासकमान धरणाची निर्मिती झाल्यानंतर भीमा नदीमध्ये बारमाही पाणी राहू लागले. परंतु, पाणी नदीत साठू लागल्याने पाण्याचा अपव्ययही त्या प्रमाणात वाढू लागला. शेतीला उसाचे सर्रास पीक घेत पाणी रात्रंदिवस सोडून देण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याने परिसरातील शेतीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढून अनेक ठिकाणची शेतीही आज नापीक बनू लागली आहे.जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शिरूर-हवेली तालुक्यात मात्र दुष्काळ काय असतो, हेच भीमा नदीकाठच्या गावांना माहीत नसल्यासारखी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना तोटीच नसल्याने पाणी भरून गेल्यानंतर नळाचे पाणी तसेच मोकळे सोडले जाते. तर या नळांच्या पाण्याचा वापर प्रेशरने गाड्या धुण्यास, बांधकामांना पाणी मारण्यासाठी सर्रास केला जातो. (वार्ताहर)शुद्ध प्रकल्पातील पाणी गटारात..शुद्ध पाणी प्रकल्पातून ताशी ३ हजार लिटर शुद्ध पाणी तयार होते. तर २ हजार लिटर पाणी वेस्टेज होते. हे पाणी अक्षरश: गटारांमध्ये सोडून दिले जाते. म्हणजे एका गावात जर शुद्ध पाणी प्रकल्प सात ते आठ तास चालत असेल, तर सुमारे १६ हजार लिटर वेस्टेज पाणी गटारात सोडले जात असून, शिरूर-हवेली-दौंड तालुक्यांत सुमारे १२० पेक्षा जास्त प्रकल्प उभे आहेत. या प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, तरीही कोणतीच ग्रामपंचायत या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा साधा विचारही करू शकत नाही, ही शोकांतिका आहे.