शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

भीमा नदीकाठी पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 13, 2016 03:24 IST

राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली

कोरेगाव भीमा : राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली तालुक्यात मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पूर्वी भीमा नदीकाठच्या गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. नदीमध्ये खड्डे खोदून झरे तयार करून या झऱ्यांमधून हंड्यात पाणी भरून घरी आणावे लागत असे. १९९४ साली चासकमान धरणाची निर्मिती झाल्यानंतर भीमा नदीमध्ये बारमाही पाणी राहू लागले. परंतु, पाणी नदीत साठू लागल्याने पाण्याचा अपव्ययही त्या प्रमाणात वाढू लागला. शेतीला उसाचे सर्रास पीक घेत पाणी रात्रंदिवस सोडून देण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याने परिसरातील शेतीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढून अनेक ठिकाणची शेतीही आज नापीक बनू लागली आहे.जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शिरूर-हवेली तालुक्यात मात्र दुष्काळ काय असतो, हेच भीमा नदीकाठच्या गावांना माहीत नसल्यासारखी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना तोटीच नसल्याने पाणी भरून गेल्यानंतर नळाचे पाणी तसेच मोकळे सोडले जाते. तर या नळांच्या पाण्याचा वापर प्रेशरने गाड्या धुण्यास, बांधकामांना पाणी मारण्यासाठी सर्रास केला जातो. (वार्ताहर)शुद्ध प्रकल्पातील पाणी गटारात..शुद्ध पाणी प्रकल्पातून ताशी ३ हजार लिटर शुद्ध पाणी तयार होते. तर २ हजार लिटर पाणी वेस्टेज होते. हे पाणी अक्षरश: गटारांमध्ये सोडून दिले जाते. म्हणजे एका गावात जर शुद्ध पाणी प्रकल्प सात ते आठ तास चालत असेल, तर सुमारे १६ हजार लिटर वेस्टेज पाणी गटारात सोडले जात असून, शिरूर-हवेली-दौंड तालुक्यांत सुमारे १२० पेक्षा जास्त प्रकल्प उभे आहेत. या प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, तरीही कोणतीच ग्रामपंचायत या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा साधा विचारही करू शकत नाही, ही शोकांतिका आहे.