शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहर परिसरात होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 19, 2017 04:19 IST

सरासरी पाऊस पडला असला, तरी उन्हाचा भीषण तडाखा पाहता यंदा एकीकडे पाण्यासाठी घशाला पडलेली कोरड, तर दुसरीकडे विनाकारण वाया जाणारे पाणी

भोसरी : सरासरी पाऊस पडला असला, तरी उन्हाचा भीषण तडाखा पाहता यंदा एकीकडे पाण्यासाठी घशाला पडलेली कोरड, तर दुसरीकडे विनाकारण वाया जाणारे पाणी, असे चित्र दिसत आहे. वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यवसाय, उद्योग व्यवसाय व हॉटेलमध्ये ग्राहकांकडून वाया जाणाऱ्या पाण्यापर्यंत दररोज हजारो लिटर पाणी शहरात वाया जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.भोसरी व परिसरात काही भागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही नागरिकांकडून विजेच्या मोटारीद्वारे पाणी घेण्याचाही प्रकार घडत आहे. नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. टॅँकरमध्येही पाणीगळती विविध सोसायट्या, हॉटेल, तसेच कारखान्यांमध्ये वापरासाठी मागवले जाणारे पाणी टँकरच्या माध्यमातून येते. पण टँकरच्या व्हॉल्व्ह गळतीतून कित्येक लिटर पाणी दररोज वाया जात आहे. प्रत्येक टॅँकरमध्ये पूर्ण पाणी भरल्यानंतर चालकाचे दुर्लक्ष झाल्यास हजारो लिटर पाणी अक्षरश: वाया जाते. तसेच, टॅँकर व्यवस्थित न लागल्यासही पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येते. वस्त्यांमध्ये पाण्याचा अपव्यय लांडेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती भागात लहान मुलांना पाणी भरण्यासाठी बसविण्याच्या प्रकारामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नळ चोरीला गेल्याने येथील पाण्याच्या टाक्यांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. मात्र, हे नळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात नाही. या वस्त्यांप्रमाणेच मुबलक पाणी असलेल्या वस्त्यांमध्ये पाण्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्याचे पाण्याच्या शोधार्थ पादचाऱ्यांची नजर भिरभिरत असते. भोसरीत अनेक सामाजिक संघटना व मित्र मंडळांनी ठिकठिकाणी पाणपोयीची व्यवस्था केली असून, त्याचा वापर पिण्यासाठी व्हावा असा उद्देश आहे; पण अनेकदा नागरिक पाणपोईचा हात, पाय, तोंड धुण्यासाठी वापर करत असून पाण्याचा अपव्यय होत आहे. वाहने, बंगले, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याचे चित्र दररोज दिसून येते. ग्राहक संपल्यानंतर कामगारांकडून रात्री उशिरा छोटी-मोठी हॉटेल, रेस्टॉरंट्स व मॉल्स पिण्याच्या पाण्याचा उपयोग करून सर्रासपणे धुतले जात आहेत. याबरोबरच वाहने, बंगले व घरे धुण्यासाठीही पाण्याचा वापर केला जातो.सध्या लग्नसराई सुरू असून, परिसरातील मंगल कार्यालयांत कार्यक्रमासाठी पाण्याचे डबे मागवले जात आहेत; पण पाहुणे मंडळींकडून, लहान मुलांकडून हळद खेळण्याबरोबरच पाणी खेळण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांत पाण्याचा अपव्यय सर्रासपणे पाहायला मिळतो. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, पाणी टाकून देण्याचा प्रकार दररोजच घडत आहे. सार्वजनिक नळकोंडाळी, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांबरोबरच विविध शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांमधील नळ नादुरुस्त असणे किंवा नळ चोरीला जाण्यामुळे त्या ठिकाणी रात्रंदिवस पाणीगळती होते. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून एका मिनिटाला एक लिटर अशा वेगाने पाणी वाया जाते. पाणी वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना नाही.भोसरीत वॉशिंग सेंटरवर सर्रासपणे पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टेल्को रस्त्यालगतच्या गळक्या व्हॉल्व्हमधून पाणीगळती सुरू आहे. त्यातच वाहनचालक गाड्या धुण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी टँकरमधूनही पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.