शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शहर परिसरात होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 19, 2017 04:19 IST

सरासरी पाऊस पडला असला, तरी उन्हाचा भीषण तडाखा पाहता यंदा एकीकडे पाण्यासाठी घशाला पडलेली कोरड, तर दुसरीकडे विनाकारण वाया जाणारे पाणी

भोसरी : सरासरी पाऊस पडला असला, तरी उन्हाचा भीषण तडाखा पाहता यंदा एकीकडे पाण्यासाठी घशाला पडलेली कोरड, तर दुसरीकडे विनाकारण वाया जाणारे पाणी, असे चित्र दिसत आहे. वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यवसाय, उद्योग व्यवसाय व हॉटेलमध्ये ग्राहकांकडून वाया जाणाऱ्या पाण्यापर्यंत दररोज हजारो लिटर पाणी शहरात वाया जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.भोसरी व परिसरात काही भागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही नागरिकांकडून विजेच्या मोटारीद्वारे पाणी घेण्याचाही प्रकार घडत आहे. नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. टॅँकरमध्येही पाणीगळती विविध सोसायट्या, हॉटेल, तसेच कारखान्यांमध्ये वापरासाठी मागवले जाणारे पाणी टँकरच्या माध्यमातून येते. पण टँकरच्या व्हॉल्व्ह गळतीतून कित्येक लिटर पाणी दररोज वाया जात आहे. प्रत्येक टॅँकरमध्ये पूर्ण पाणी भरल्यानंतर चालकाचे दुर्लक्ष झाल्यास हजारो लिटर पाणी अक्षरश: वाया जाते. तसेच, टॅँकर व्यवस्थित न लागल्यासही पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येते. वस्त्यांमध्ये पाण्याचा अपव्यय लांडेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती भागात लहान मुलांना पाणी भरण्यासाठी बसविण्याच्या प्रकारामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नळ चोरीला गेल्याने येथील पाण्याच्या टाक्यांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. मात्र, हे नळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात नाही. या वस्त्यांप्रमाणेच मुबलक पाणी असलेल्या वस्त्यांमध्ये पाण्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्याचे पाण्याच्या शोधार्थ पादचाऱ्यांची नजर भिरभिरत असते. भोसरीत अनेक सामाजिक संघटना व मित्र मंडळांनी ठिकठिकाणी पाणपोयीची व्यवस्था केली असून, त्याचा वापर पिण्यासाठी व्हावा असा उद्देश आहे; पण अनेकदा नागरिक पाणपोईचा हात, पाय, तोंड धुण्यासाठी वापर करत असून पाण्याचा अपव्यय होत आहे. वाहने, बंगले, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याचे चित्र दररोज दिसून येते. ग्राहक संपल्यानंतर कामगारांकडून रात्री उशिरा छोटी-मोठी हॉटेल, रेस्टॉरंट्स व मॉल्स पिण्याच्या पाण्याचा उपयोग करून सर्रासपणे धुतले जात आहेत. याबरोबरच वाहने, बंगले व घरे धुण्यासाठीही पाण्याचा वापर केला जातो.सध्या लग्नसराई सुरू असून, परिसरातील मंगल कार्यालयांत कार्यक्रमासाठी पाण्याचे डबे मागवले जात आहेत; पण पाहुणे मंडळींकडून, लहान मुलांकडून हळद खेळण्याबरोबरच पाणी खेळण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांत पाण्याचा अपव्यय सर्रासपणे पाहायला मिळतो. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, पाणी टाकून देण्याचा प्रकार दररोजच घडत आहे. सार्वजनिक नळकोंडाळी, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांबरोबरच विविध शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांमधील नळ नादुरुस्त असणे किंवा नळ चोरीला जाण्यामुळे त्या ठिकाणी रात्रंदिवस पाणीगळती होते. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून एका मिनिटाला एक लिटर अशा वेगाने पाणी वाया जाते. पाणी वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना नाही.भोसरीत वॉशिंग सेंटरवर सर्रासपणे पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टेल्को रस्त्यालगतच्या गळक्या व्हॉल्व्हमधून पाणीगळती सुरू आहे. त्यातच वाहनचालक गाड्या धुण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी टँकरमधूनही पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.