शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

वीजपंप बिघडल्याने पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: June 8, 2015 05:22 IST

वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात.

टाकवे बुद्रुक : वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात. वडेश्वर, गभालेवाडी, मोरमारवाडी, लष्करवाडी, माऊ, दवणेवाडी या गावांना वडेश्वर ग्रामपंचायतीमार्फत नळ पाणीपुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र मागील दहा दिवसांपासून वीज पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने योजना बंद आहे. उन्हाने अंगाची प्रचंड लाही लाही होत असताना उन्हाचे चटके सोसत बाया बापडे ठोकळवाडी धरणातून पाणी वाहत आहेत. सुमारे एक ते आठ किलोमीटरपर्यंत पायपीट करीत बैलगाडी, दुचाकी, जीपमधून पिण्याचे पाणी आणले जात आहे. मशागतीच्या दिवसात अधिक वेळ पाणी आणण्यासाठी जात असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होतो.गावालगतच्या विहिरीवरील दूषित पाण्याचा वापर घरगुती आणि जनावरांसाठी केला जातो. पाण्यासाठीची भटकंती पाहून वीज पंपात झालेला तांत्रिक बिघाड दूर करावा, अशी मागणी महिलांकडून होत आहे.दहा दिवसांपासून अख्खा गाव आणि वाड्या-वस्त्या पाण्यासाठी धरणावर जात आहेत. त्याच्या सोबतीला लोकप्रतिनिधींचे कुटुंबीय देखील आहेत. पाण्यासाठीची भटकंती लोकप्रतिनिधींच्या कानावर जात नाही का, असा सवाल अनेक महिलांनी केला. ग्रामपंचायतीच्या इतर दोन वाड्यांवर नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत आहे. मग इतर गावे आणि वाड्या-वस्त्या तहानलेल्या कशा असा प्रश्न वडीलधाऱ्यांनी मांडला. एरवी अग्रेसर असणारे लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत एवढे उदासीन का? उन्हाच्या झळा सोसत पाण्यासाठी वणवण करणाऱ्यांची सुटका लवकर व्हावी, अशी मागणी या परिसरातील बाळू मोरमारे, बिबाबाई मोरमारे, बारकाबाई गभाले, रामदास खांडे, अंजना मोरमारे यांनी केली.सरपंच संतोषी खांडभोर म्हणाल्या, ‘‘पाच वर्षांत पहिल्यांदाच तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पंप दुरुस्तीसाठी पाठवला असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. आदिवासी ग्रामपंचायत असल्याने दुसऱ्या पंपाची सोय नाही.’’ (वार्ताहर)