शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

भाजप नेत्यांची मागणी : १५ वर्षांपासूनच्या पाणी वाटपाची माहिती घ्या लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : उजनीचे पाच टीएमसी ...

भाजप नेत्यांची मागणी : १५ वर्षांपासूनच्या पाणी वाटपाची माहिती घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी घेतल्यानंतर पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या वादात आता भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. उजनी धरणातील पाणी वापराचे गेल्या १५ वर्षांचे ऑडिट करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उजनी धरण उभारणीसाठी भरीव योगदान देणाऱ्या इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, तालुक्यातील जनतेच्या विरोधात जाणूनबुजून जनमत तीव्र करण्याचे काम वनमंत्री विभागाचे राज्यमंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केले, असा आरोप चवरे यांनी केला आहे.

चवरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील ६३ हजार एकर शेतीसाठी पाच टीएमसी पाणी उजनीतून उचलून देण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. १९९५ पासून सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. वास्तविक पाहता हा निर्णय प्रत्यक्षात यायला चार ते पाच वर्षे लागणार आहेत, असे असताना सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या भरणे यांच्या या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध झाला. इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विरोधात वातावरण तापवले गेले. उजनी धरण उभे राहताना सर्वाधिक विस्थापित इंदापूर येथील आहेत. ५० वर्षे झाली, तरी विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. ११७ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा ६३ टीएमसी इतका प्रचंड आहे. हे पाणी सोलापूर जिल्हा तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग यांची तहान भागविण्यासाठी तसेच भीमा-सिना प्रकल्प, औद्योगिक वसाहती यासाठी वापरले जाते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड या अफाट लोकसंख्या असलेल्या दोन शहरांसाठी खडकवासला धरण साखळीतील २१ ते २३ टीएमसी इतके पाणी पुरेसे होते. याच पाण्यातून दौंड, इंदापूर, शिरूर तालुक्यातील तलावही भरून घेतले जातात. दौंड तसेच शिरुर तालुक्यातील शेतीसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी दिले जाते. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील तब्बल ६३ टीएमसी पाणी कुठे जिरते? याचे आॅडिट करणे, गरजेचे झाले आहे.

चौकट

उजनीचा मृत पाणीसाठा हा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या साठवण क्षमतेपेक्षा अधिक आहे. असे असताना पुणे जिल्ह्याच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्राला ६३ टीएमसी पाणी का पुरत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेल्या १५ वर्षांचे पाणी वापराचे ऑडिट केले, तर उजनीचे पाणी कुठे जिरते, याचे उत्तर मिळेल, असे माऊली चवरे यांनी म्हटले आहे.