शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था

By admin | Updated: May 18, 2016 01:10 IST

दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत.

बिबवेवाडी : उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याचे दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत. एवढा प्रचंड भीषण दुष्काळ या भागात असताना, दि पूना मर्चंटच्या वतीने वाशी तालुक्यातील ५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.वाशी तालुक्यातील पारगाव, जनकापूर, रुई, वायसेवस्ती, आनंदनगर, पवारवस्ती या भागात राहणाऱ्या सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांची तीव्र उन्हातील तहान भागविण्याचा निर्णय चेंबरने घेतला आहे. दररोज ३ पिण्याच्या पाण्याचे टँकर १ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले होते. लाइटच्या त्रासामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविणे देखील अवघड जात होते. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, विजय नहार, अमित नहार यांनी या ठिकाणची पाहणी केली व त्यांनतर तातडीने ५ पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. तसेच १६ मेपासून दररोज ४ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.प्रत्येक घरात २ घागरी या पद्धतीने या ठिकाणी पिण्याचे पाणी पारगाव जैन संघटनेच्या सहकार्याने वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, या भागात आणखी मदतीची आवश्यकता असून, अनेक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले आहे. (वार्ताहर)