शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पाण्यावरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 04:30 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई बाबत पुणे स्टेशन येथील विधानभवन येथे आयोजित केलेल्या कालवा समिती बैठकीत पुण्याच्या पाण्यावरून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप

पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाई बाबत पुणे स्टेशन येथील विधानभवन येथे आयोजित केलेल्या कालवा समिती बैठकीत पुण्याच्या पाण्यावरून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पुण्याला ज्या कालव्यातून पाणी येते, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने ती रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना देऊनही पालिका त्याबाबत काहीच करीत नसल्याने आणि नळबंद योजना सुरू करीत नसल्याने पालकमंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. कालवा दुरुस्त करण्यासाठी पुण्याला पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. पुण्याच्या पाण्यात कपात करणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यामुळे पालकमंत्री आणि महापौरांमध्ये बैठकीत शाब्दिक वादावादी झाली. खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या ५.६५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील तीन महिन्यांत यातील सुमारे १.३५ टीएमसी पाण्याचे बाष्पिभवन होणार आहे, तर पुणे शहराला या धरणांमधून ३.९० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये केवळ ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. दौंड शहर व जिल्ह्याला ०.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातूनही पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुण्याला पुरवठा होणाऱ्या कालव्याची गळती थांबली आणि नळबंद योजनेतून पाणी घेण्यास सुरुवात केली, तर सुमारे ०.५० टीएमसी पाणी शिल्लक राहू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर सध्याचा शिल्लक पाणीसाठा पाहता पुणे शहरात अजून थोडी पाणीकपात केली, तर जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पुरविता येईल. त्यामुळे महापौरांनी पुढाकार घ्यावा आणि पाणीकपात वाढवावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव आणि आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिला. या प्रस्तावास महापौर जगताप यांनी तातडीने विरोध केला.कालवा समिती बैठकीत पालिकेला कालवा गळतीची पाहणी करून, गळतीची ठिकाणे शोधण्यास सांगितले होते, ते झाले आहे का, अशी विचारणा पालकमंत्री बापट यांनी महापौर व पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना केली. त्यावर अशी पाहणी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री संतप्त झाले. पुण्याचे पाणी कोणालाच देणार नाही : महापौर जगतापसध्या खडकवासला धरण साखळीमध्ये असलेले पाणी हे पुणे शहराचे हक्काचे पाणी आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करून पाण्याची ही बचत करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर केवळ पुणेकरांचाच हक्क आहे. ग्रामीण भागासाठी जे दीड टीएमसी पाणी मागितले जात आहे, ते व्यवहार्य नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियम सांगितले, त्याचेच आम्ही पालन केले आहे. दौड व इंदापूरसाठी जे पाणी सोडण्याचा आग्रह केला जात आहे ते पाणी बाष्पीभवन, कालव्यांच्या नादुरुस्तीमध्येच, मोटारपंपाने पाणी उचलणे या साऱ्या बाबींचा विचार करता पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी, हे स्पष्ट होत नाही. सध्या खडकवासला धरणात जे पाणी आहे ते केवळ पुणे शहरालाच लागणार आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीतही मी हीच बाजू मांडणार आहे, अशी भूमिका महापौर प्रशांत जगताप यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितली.बुधवारी करणार कालव्याची पाहणी : पालकमंत्री बापटपुणे शहरासाठी खडकवासला धरणातून कालव्यातून जो पाणीपुरवठा होतो, त्या कालव्यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. कालवा समितीच्या बैैठकीत पालिकेला गळती रोखण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. मी स्वत: जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गळतीची बुधवारी पाहणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. त्यानंतर काय उपाय योजना करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.‘‘पाणीगळतीबाबत पालिका बेफिकीर आहे. याबाबत मी अनेकदा महापौर, आयुक्त, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले; मात्र ते ऐकतच नाहीत; पण मला पूर्ण जिल्ह्याची काळजी करायची आहे. त्यामुळे ही पाणीगळती पाहण्यासाठी आणि नळबंद योजनेचे काम किती झाले, हे पाहण्यासाठी मी प्रत्यक्षात जातो,’’ असे सांगत, ‘‘मी सारखी भीक मागायला तुमच्या दारात येणार नाही,’’ अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी महापौरांना सुनावले.