शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

पिंपळगाव जोगातून तीन जिल्ह्यांना पाणी

By admin | Updated: April 14, 2016 02:07 IST

पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत

नारायणगाव : पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने पाणीप्रश्न पुन्हा पेटणार, अशी चिन्हे आहेत. कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवून दि़ १५ किंवा १६ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे़ पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मोठा संघर्ष होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई येथे मंत्रालयात कुकडी, घोड आणि दारणा या धरणांतून पाणी सोडण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली़ या बैठकीला नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार दिलीप गांधी, आमदार दिलीप वळसे-पाटील, राहुल जगताप, विजय औटी, बाबूराव पाचर्णे, नारायण पाटील, स्रेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते़ या वेळी विविध मान्यवरांनी पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. कुकडी पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे ज्या धरणात ४ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, त्या धरणातून पिण्याबरोबरच फळबागा वाचविण्यासाठी कुकडीतून आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी झाली़ महाजन म्हणाले, की पिंपळगाव जोगा धरणात ४.४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या धरणातून २.३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ पिंपळगाव जोगा धरणातून येडगाव धरणात आणि त्या धरणातून कुकडी डावा व मीना शाखा कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ आहे़ (वार्ताहर)करमाळ्यापर्यंत पाणी पिंपळगाव जोगा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यापर्यंत सोडण्यात येणार आहे़ बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.