शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

निमगावात पाण्याचे टँकर बंद

By admin | Updated: April 19, 2016 01:04 IST

निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे.

निमगाव केतकी : निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आल्याने पाण्याची टंचाई पुन्हा निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईची झळ केतकेश्वर महाराज यात्रेच्या निमीत्ताने येणाऱ्या भाविकांना बसणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बंद करण्यात आलेले पाण्याचे टँकर तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावेत, याकरिता जिल्हा परिषेद सदस्य देवराज जाधव पाठपुरावा करीत आहेत. मात्र, तलाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून टँकर सुरू करण्यासाठीची कोणतीही कार्यवाही अद्याप केली जात नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री केतकेश्वरमहाराज यांची यात्रा तीन दिवस भरवली जाते. या यात्रेच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असलेले नागरिक गावी येतात. याबरोबरच, यात्रेमध्ये व्यवसाय करण्यासाठी पाळणेवाले, खेळणीविक्रेते, फळविक्रेते, खाद्य पदार्थविक्रेते, आइस्क्रीमविक्रेते आदी येतात. त्यांना पाण्याची आवश्यकता असते; परंतु पाणीटंचाई असल्याने या व्यवसायिकांना पाणी कसे पुरवायचे, याचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाले आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक काढली जाते. या वेळी निमगाव केतकीसह परिसरातील अनेक गावांतील भाविक श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. काही भाविक नवस फेडण्यासाठी येतात. या मिरवणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अवश्यक असते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीकेतकेश्वर महाराजांच्या पालकीची मिरवणूक काढण्यात येते.या वेळी हे कार्यक्रम पाहण्यासाठी महिला व पुरुष मोठया संख्येने परिसरातून येतात. या वेळी आलेल्या यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे असते.