शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक वाहनातून पाणीपुरवठा

By admin | Updated: April 24, 2016 04:22 IST

बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यास पाणीप्रश्न सोडविण्यास एमआयडीसी प्रशासन अद्यापही अयशस्वी ठरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील

बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यास पाणीप्रश्न सोडविण्यास एमआयडीसी प्रशासन अद्यापही अयशस्वी ठरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील पाणीपुरवठा ठप्प आहे. अखेर शनिवारी (दि. २३) अखेर नगरपालिका प्रशासनाची मदत घेण्यात आली. येथील ‘रेसिडेन्शियल झोन’मध्ये अग्निशमन वाहनामधून पाणीपुरवठा करण्यात आला.पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकांची नोकरी संभाळून पाण्यासाठी भटकंती करताना दमछाक होत आहे. अखेर पाणीपुरवठा न सुरू झाल्याने बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी पाण्याच्या समस्येबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी त्याची तातडीने दखल घेत याबाबत नगराध्यक्ष योगेश जगताप यांना सूचना दिल्या. त्यानंतर येथील नागरिकांना अग्निशामक वाहनातूनच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.काकडे यांनी सांगितले, की वेळेत पाणीपुरवठा करण्याचे एमआयडीचे प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात अपूर्णच आहे. आज सहावा दिवस आहे. या भागात अक्षरश: एक थेंबदेखील पाणीपुरवठा झालेला नाही. उद्योजकांनी मुख्य अभियंता पाटील यांच्याकडे येथील नियोजनाच्या अभावाची तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनाशी पाणीचोरीबाबत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना समज दिली आहे. आगामी काळात पाणी जलवाहिनी फोडण्याचे प्रकार झाल्यास पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार आहे. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की उद्योजकांच्या तक्रारीनंतर पाणीचोरी बंद होण्याची आशा आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून बारामतीच्या पाणीपुरवठा केंद्रात पाणी पोहोचले आहे. रात्रीपर्यंत पुरेसा साठा झाल्यानंतर उद्या सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. (प्रतिनिधी)प्रशासनाचा दावा खोटाउजनीतून पाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी कमालीची घटली. परिणामी, बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. तर, ढिसाळ नियोजनामुळे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा दावादेखील खोटा ठरला आहे.