शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१५ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच

भोसरी : जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. १५ एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिघी येथे केले. शहरातील रस्ते, रेल्वे पूल, शाळा, भाजी मंडई अशा विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. दिघीतील कार्यक्रमात ते बोलत होते.पवार म्हणाले, ‘‘ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य भागांतून मोठ्या संख्येने नागरिक शहरांकडे येत आहेत. त्याचा ताण शहरावर येऊ लागला आहे. त्यातच पवना धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणायला हवे. या वर्षी भामा किंवा आंद्रा यातील एका धरणातून पाणी आणण्यात येईल. (वार्ताहर) लांडेना पाहिले की लांडगे गरम होतातभोसरीतील कार्यक्रमांमध्ये माजी आमदार विलास लांडे उपस्थित नव्हते. दरम्यान, प्रास्ताविक भाषणात आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचे आभार मानले. त्याचा उल्लेख आपल्या भाषणात करत पवार म्हणाले, लांडे यांनी यापूर्वीच भोसरी मतदारसंघात आपले स्वागत केले आहे. आता महेश लांडगे यांनी आभार मानले. सध्या खूप गरम होत असल्याने ७ तारखेला होत असलेला मंडईच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारऐवजी संध्याकाळी घेतला आहे. मात्र, येथे लांडेंना पाहिले की लांडगे गरम होतात, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. ....अन् अजित पवारांचा ताफा थांबलाएक कार्यक्रम आटोपून पुढील कार्यक्रमासाठी ताफा जात असतानाच चिंचवड, दळवीनगर येथील पुलावर पवार यांचा ताफा अचानक थांबला. एका अपघातात जखमी झालेल्या मुलीची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्यानंतर ताफा मार्गस्थ झाला. ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्याभूमिपूजन केलेल्या विविध विकास प्रकल्पांचा खर्च निविदा रकमेपेक्षा कमी असल्याबाबत बोलताना पवार म्हणाले, करदात्यांच्या पैशांची अधिकाधिक बचत व्हावी, असा प्रयत्न असला, तरी कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. विकासकामे करताना ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.