शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

१५ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच

भोसरी : जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. १५ एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिघी येथे केले. शहरातील रस्ते, रेल्वे पूल, शाळा, भाजी मंडई अशा विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. दिघीतील कार्यक्रमात ते बोलत होते.पवार म्हणाले, ‘‘ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य भागांतून मोठ्या संख्येने नागरिक शहरांकडे येत आहेत. त्याचा ताण शहरावर येऊ लागला आहे. त्यातच पवना धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणायला हवे. या वर्षी भामा किंवा आंद्रा यातील एका धरणातून पाणी आणण्यात येईल. (वार्ताहर) लांडेना पाहिले की लांडगे गरम होतातभोसरीतील कार्यक्रमांमध्ये माजी आमदार विलास लांडे उपस्थित नव्हते. दरम्यान, प्रास्ताविक भाषणात आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचे आभार मानले. त्याचा उल्लेख आपल्या भाषणात करत पवार म्हणाले, लांडे यांनी यापूर्वीच भोसरी मतदारसंघात आपले स्वागत केले आहे. आता महेश लांडगे यांनी आभार मानले. सध्या खूप गरम होत असल्याने ७ तारखेला होत असलेला मंडईच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारऐवजी संध्याकाळी घेतला आहे. मात्र, येथे लांडेंना पाहिले की लांडगे गरम होतात, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. ....अन् अजित पवारांचा ताफा थांबलाएक कार्यक्रम आटोपून पुढील कार्यक्रमासाठी ताफा जात असतानाच चिंचवड, दळवीनगर येथील पुलावर पवार यांचा ताफा अचानक थांबला. एका अपघातात जखमी झालेल्या मुलीची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्यानंतर ताफा मार्गस्थ झाला. ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्याभूमिपूजन केलेल्या विविध विकास प्रकल्पांचा खर्च निविदा रकमेपेक्षा कमी असल्याबाबत बोलताना पवार म्हणाले, करदात्यांच्या पैशांची अधिकाधिक बचत व्हावी, असा प्रयत्न असला, तरी कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. विकासकामे करताना ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.