शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

मोठ्या गावांचा पाणीपुरवठा अडचणीत

By admin | Updated: May 7, 2017 02:26 IST

अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : अकस्मात निर्माण झालेल्या या भारनियमनाच्या संकटामुळे फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोलीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.गेल्या चार दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीकडून विजेच्या तुटवड्याचे कारण सांगून होत असलेल्या अघोषित भारनियमनामुळे बळीराजासमवेत सर्वसामान्य नागरिकही हैराण झाला असल्याचे चित्र हवेली तालुक्यात दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुळा-मुठा नदीतिरावर असलेल्या कोलवडी या गावात १४ तास तसेच उरुळी कांचन उपविभागातील अष्टापूर, बिवरी, हिंगणगाव, भवरापूर या गावांत नदीजवळ असूनही तसेच कालव्यावर अवलंबून असलेल्या वळती, शिंदवणे, डाळिंब तरडे या गावांतही भारनियमनामुळे शेतीसिंचनासाठी पाणी उचलता येत नाही. प्ाूर्वी डिझेल इंजिनाचा वापर होत होता. त्यांमुळे विद्युतप्रवाह खंडित झाला तरी पाणी उचलले जात होते. परंतु, आता ती कालबाह्य झाली  असून शेतकऱ्यांना विद्युत मोटारींशिवाय पर्याय नाही.  त्यामुळे विद्युतप्रवाह खंडित झाला  की, त्याला वीज येण्याची वाट  पाहावी लागते.या परिसरात मुख्यत्वेकरून मेथी, कोथिंबीर, पालक, फ्लॉवर, कोबी या भाजीपाल्यासह उसाची लागवड केली जाते. उन्हाळ्यात भाजीपाला जळून जातो. म्हणून कमी पाण्यात जास्त व चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळावे व आपणास चार पैसे जास्त मिळावेत, या उद्देशाने येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. ठिंबक सिंचनाद्वारे पाणी रोज द्यावे लागते. यामुळे भर उन्हाळ्यात भरघोस उत्पादन मिळते. परंतु, कसलेही वेळापत्रक जाहीर न करता सुरू झालेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेली नगदी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.