शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

भिगवणला वाळूउपसा करणाऱ्या ३८ बोटींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 02:41 IST

जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त; उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूमाफियांवर कारवाई

भिगवण : महसूल पथकाने वाळूमाफियांचे हात चांगलेच आवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. खानवटे (ता.दौंड), डिकसळ (ता. इंदापूर) आणि कात्रज (ता. करमाळा) येथील भीमा नदीपात्रात पहाटे साडेचार वाजता कारवाई केली. तीनही तालुक्यांच्या संयुक्त पथकाने दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तब्बल ३८ वाळूउपशाच्या फायबर बोटी जिलेटिनच्या साह्याने उडविण्यात आल्या. रात्री ८ वाजेपर्यंत कारवाई चालूच होती.गुरुवारी (दि. १४) उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी व करमाळ्याच्या तहसीलदारांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना घेऊन स्वत: पाण्यात उतरून दिवसभर धडक कारवाई केली. २६ वाळू उपसा करणाºया बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदार यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून बोटी उद्ध्वस्त केल्या.इंदापूरमधील तक्रारवाडी-डिकसळ येथे वाळूउपसा करून दौंड तालुक्यातील खानवटे आणि कात्रज गावात वाळू बाहेर काढणाºया वाळूमाफियांवरील ही कारवाई राज्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. कारवाईत दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, सोनाली मेटकरी, सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार यांच्यासह पोलीस केशव चौधर, अविनाश कांबळे यांनी कारवाई पथकात सहभाग घेतला होता.सर्वांत मोठी कारवाई : पथकाची कुणकुण लागताच साहित्य सोडून पसारउजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाचा फौजफाटा घेऊन तहसीलदार येणार असल्याची खबर वाळूमाफियांना लागताच, वाळू उपसा करणारे चोरटे तहसीलदारांची गाडी पाहून पसार झाले. त्यामुळे उजनीच्या नदीपात्रातील ज्या १३ फायबरच्या बोटी आणि १३ सेक्शन अशा २६ वाळूउपसा करणाºया बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदारांनी महसूल कर्मचाºयांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून त्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईमुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा करणाºया माफियांचे धाबे दणालले आहे. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बोटी उद्ध्वस्त केल्याने वाळूमाफियांना बसला आहे. ही कारवाई इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावी सकाळपासून १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाळूमाफियांचे फावले होते. शासकीय यंत्रणा निवडणूक कामकाजात व्यस्त असल्याने वाळू- माफियांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस चालू केला होता.त्यामुळे संयुक्त कारवाई करीत वाळूमाफियांचे कंबरडे मोडण्याची कारवाई करण्यात आली आणि वाळू- माफियांनी असे कृत्य केल्यास त्यांना शासकीय नियमनुसार दंड ठोठावून तुरुंगाचीही हवा खावी लागेल, त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गौण खनिजाची चोरी करणाºया वाळूचोरांनी इथून पुढे पाण्यात वाळूउपाशाची बोट सोडली, तर याद राखा... असा सज्जड दम तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वाळूमाफियांना दिला आहे.