शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पाणी वाचवायला शिकले पाहिजे

By admin | Updated: March 21, 2017 05:24 IST

पाणी वाचविणे ही आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याचे स्रोत खराब होऊ नयेत याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही

पुणे : पाणी वाचविणे ही आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याचे स्रोत खराब होऊ नयेत याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात रोटरी क्लब ३१३१ यांनी आयोजित केलेल्या ‘जलोत्सव २०१७’मध्ये त्या बोलत होत्या. या वेळी रोटरी क्लब आॅफ पूना डाऊनटाऊनच्या अध्यक्ष पल्लवी साबळे, रोटरी क्लब आॅफ शनिवारवाड्याच्या अध्यक्ष मीना भोंडवे आणि जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे या वेळी उपस्थित होते. खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘‘पाण्याचा योग्य वापर व योग्य नियोजन केले नाही, तर पुढील पिढीवर त्याचे परिणाम होतील. आज आपल्यावर ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आहे. पाण्याविषयी जलसाक्षरता, जागरूकता वाढली पाहिजे. पुण्याला सुदैवाने मुबलक पाणी आहे; पण ४० टक्के लिकेजमुळे पाणी वाया जाते. लिकेज दुरुस्ती करणे, जुन्या पाईपलाईन बदलणे गरजेचे आहे.’’प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष देशपांडे, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्ही. एम. रानडे यांनी मार्गदर्शन केले. अजय मोकाशी आणि सोनाली मोकाशी यांनी सादरीकरणातून गाड्या धुतलेले पाणी, हॉटेलमधील वापरलेले पाणी या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर कसा केला जातो, याविषयी माहिती दिली. जीवित नदीचे मनीष घोरपडे, ग्रीन थंबचे कर्नल सुरेश पाटील तसेच खासदार चव्हाण यांचा शैलेश पालकर व अन्य रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. समीर शास्त्री यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)