शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बारामतीच्या ४३ गावांतील पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: July 29, 2016 03:49 IST

पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत

मोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नाझरे येथील धरणावर मोरगाव प्रादेशिकवर १७ गावे, माळशिरस-पारगाव नळ योजनेवर २२ गावे, तर नाझरे प्रादेशिक नळ पाणी योजनेवर ४ गावे अवलंबून आहेत. सध्या पावसाळा सुरू असूनदेखील धरणाने तळ गाठला आहे. उपलब्ध असलेल्या मृत पाणीसाठ्यातून या योजना चालविल्या जात आहेत. मात्र, केवळ जेमतेम १५ आॅगस्टपर्यंतच पाणी पुरविले जाणार आहे, असे शाखा अभियंता विजय बुरसे यांनी सांगितले. याबाबतचे पत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच यांना दिले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांना टँकर सुरू करावा लागणार आहे. यासाठी या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी पावसासाठी प्रार्थना करीत आहेत. (वार्ताहर)बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील ६४ गावे दुष्काळी आहेत. शेतीला पाणी नाही. त्यातच मोरगाव प्रादेशिक योजनाही धोक्यात आल्याने या भागातील पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे भापकर यांनी सांगितले.