शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर पार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव, पाण्याचा अपव्यय यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

चिंचवड : पाणी वापराबाबत जनजागृतीचा अभाव, पाण्याचा अपव्यय यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. पाणी कपातीसाठी एकीकडे महापालिकेने जलतरण तलाव बंद करण्याचा निर्यण घेतला. मात्र, दुसरीकडे खासगी वॉटर पार्कमध्ये दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी नेमक कुठून येते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.महापालिकेने तीन आठवड्यांपूर्वी जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खासगी वॉटर पार्क अजूनही सुरूच आहे. दररोज लाखोलीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. यामुळे अबालवृद्ध पाण्यात पोहून उन्हचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, यंदाच्या सुट्टीत तरण तलाव बंद असल्याने सर्वजण वॉटर पार्ककडे वळाले. दरवर्षीपेक्षा यंदा वॉटर पार्कला जास्त गर्दी होऊ लागली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना केवळ पैसे कमविण्यासाठी कोणताही विचार न करता वॉटर पार्क सुरूच ठेवले आहेत. रेन डान्स, वेव पूल, डिजे डान्स यासह विविध राईड्समध्ये पाण्याचा वापर केला जातो. पाण्याशिवाय या राईड्स चालूच शकत नाही. शहरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता वॉटर पार्कच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.जलतरण तलाव बंद केल्याने पाणी वाचेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु वॉटर पार्कमध्ये राजरोसपणे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. याबाबत अद्याप कोणीही आक्षेप घेतलेला नाही. राज्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना वॉटरपार्कमध्ये पाण्याची उधळपट्टी होत आहे. तसेच अनेक हॉटेलमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. भविष्यातील पाणी कपातीचे संकट टाळण्यासाठी आतापासूनच प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरामध्येही भीषण पाणीटंचाई होऊ शकते. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती केली. पण वॉटर पार्कमधील उधळपट्टीबाबत गप्प का आहेत असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. (वार्ताहर)>उन्हाळी हंगामासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र, शहरात पाणीकपात असल्याने यंदा वॉटर पार्क बंद ठेवण्यात आला आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी वॉटर पार्क बंद ठेवण्यास सांगितला आहे. त्यांच्या आदेशाचे पालन केले जात आहे. शहरातील पाणीटंचाईचा विचार केला जात आहे.- डॉ. राजेश मेहता