शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 29, 2017 03:27 IST

नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचा आडसाली ऊस लागवड हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्याने या ऊस लागवडींवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नीरा डावा कालवा बंद झाला तरीही शेतकऱ्यांनी विहिरी व बोअरवेलच्या सोय केल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १ जुलै व ७ जुलैला ऊस लागवड दरवर्षीप्रमाणे होईल. मात्र सध्या नीरा डाव्या कालव्याला पाणी नाही, पाऊस नाही. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली आहे. परिणामी ऊस लागवडी होऊ शकणार नाहीत. पाऊस चांगला झाला तर नीरा खोऱ्यात १५ हजार एकरांच्या आसपास आडसाली ऊस लागवडी केली जाते. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पाऊस पडला नाही. तरीही शेतकरी नीरा देवधर, भाटघर व वीर या तीन धरणांच्या भरवशावर ऊस लागवडी करत असतो. मात्र, जून महिना संपला तरीही धरण क्षेत्रात पावसाचा एक थेंबही पडला नाही. सध्या नीरा देवघर धरणात ६.८० टक्के, भाटघर धरणात ४.२९ टक्के,तर वीर धरणात ४.५८ टक्केपाणीसाठा उरला आहे. तो पाणीसाठा पालखीसाठी पिण्यासाठी राखून ठेवलेला असतो. त्यामुळे ऊस लागवडीसाठी आता नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात मोठा ऊस व नवीन ऊस लागवड जगवणे अवघड जाणार आहे, अशा शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडीचे काहीसे क्षेत्र कमी केले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची उपलब्धता नाही, अशा शेतकऱ्यांनी पाऊस पडेपर्यंत ऊस लागवड करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.