शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

By admin | Updated: October 24, 2015 04:45 IST

शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी

पुणे : शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा गैरवापर होत आहे. तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे असे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असताना महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थंडावली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पिण्याचा पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हेल्पलाइनवर पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला. मात्र, काही दिवसांपासून पालिकेची कारवाई थंडावली आहे. शहरातील अनेक वॉशिंग सेंटर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. बांधकामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीकपात लागू केल्यानंतर काही दिवस गांभीर्याने पाण्याच्या गैरवापराकडे लक्ष देण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर काही वॉशिंग सेंटर व नागरिकांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, पाणीकपात लागू करून दोन महिने उलटल्यानंतर पाण्याच्या गैरवापराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जुलै २०१६पर्यंत पुरवावा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारीही पुण्याला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महापालिकेकडूनच पाण्याची नासाडीहडपसर आकाशवाणी केंद्राजवळ महापालिकेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातून अनेक वेळा ही टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया जाते. पाण्याचा थोडासाही गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असताना हजारो लिटर पाणी वाया घालविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरात ३० टक्के पाणीकपातयंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात केली आहे.२०४ जणांवर दंडात्मक कारवाई पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल.