शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

By admin | Updated: October 24, 2015 04:45 IST

शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी

पुणे : शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा गैरवापर होत आहे. तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे असे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असताना महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थंडावली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पिण्याचा पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हेल्पलाइनवर पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला. मात्र, काही दिवसांपासून पालिकेची कारवाई थंडावली आहे. शहरातील अनेक वॉशिंग सेंटर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. बांधकामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीकपात लागू केल्यानंतर काही दिवस गांभीर्याने पाण्याच्या गैरवापराकडे लक्ष देण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर काही वॉशिंग सेंटर व नागरिकांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, पाणीकपात लागू करून दोन महिने उलटल्यानंतर पाण्याच्या गैरवापराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जुलै २०१६पर्यंत पुरवावा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारीही पुण्याला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महापालिकेकडूनच पाण्याची नासाडीहडपसर आकाशवाणी केंद्राजवळ महापालिकेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातून अनेक वेळा ही टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया जाते. पाण्याचा थोडासाही गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असताना हजारो लिटर पाणी वाया घालविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरात ३० टक्के पाणीकपातयंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात केली आहे.२०४ जणांवर दंडात्मक कारवाई पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल.