शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

पाणीटंचाईचा महापालिकेला विसर

By admin | Updated: October 24, 2015 04:45 IST

शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी

पुणे : शहरात पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असतानाही पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाड्या धुण्यासाठी, बांधकामासाठी, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा गैरवापर होत आहे. तसेच पाणीगळती, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे असे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू असताना महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थंडावली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील सर्व खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पिण्याचा पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पाण्याचा गैरवापर होत असल्यास ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार हेल्पलाइनवर पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला. मात्र, काही दिवसांपासून पालिकेची कारवाई थंडावली आहे. शहरातील अनेक वॉशिंग सेंटर बेकायदेशीरपणे सुरू आहेत. बांधकामांसाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणीकपात लागू केल्यानंतर काही दिवस गांभीर्याने पाण्याच्या गैरवापराकडे लक्ष देण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर काही वॉशिंग सेंटर व नागरिकांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, पाणीकपात लागू करून दोन महिने उलटल्यानंतर पाण्याच्या गैरवापराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हा जुलै २०१६पर्यंत पुरवावा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारीही पुण्याला उचलावी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)महापालिकेकडूनच पाण्याची नासाडीहडपसर आकाशवाणी केंद्राजवळ महापालिकेची पाण्याची टाकी आहे. आठवड्यातून अनेक वेळा ही टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया जाते. पाण्याचा थोडासाही गैरवापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असताना हजारो लिटर पाणी वाया घालविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरात ३० टक्के पाणीकपातयंदा पाऊस कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात केली आहे.२०४ जणांवर दंडात्मक कारवाई पाण्याच्या गैरवापराच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानुसार, २०४ जणांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल.