शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अभयारण्यातील जलस्रोत कोरडे

By admin | Updated: May 20, 2017 04:59 IST

भीमाशंकर अभयारण्यातील व खेड वन विभागाच्या वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची

- लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : भीमाशंकर अभयारण्यातील व खेड वन विभागाच्या वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी असलेले वन विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य तसेच खेड वन परिक्षेत्रातील वांद्रे, खरपूड, भोमाळे या गावांच्या वनहद्दीतील पाणवठे आटल्याने जंगलात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन विभागाने बोटांवर मोजता येतील इतके कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. मात्र, भीमाशंकर वन परिक्षेत्रातील जनावरांची संख्या पाहता, पाणवठे कमी असून त्यातही पाणी नसल्याने जंगलात पाणीटंचाईचे सावट आहे. दर वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला तरी या वर्षी उन्हाच्या दाहकतेमुळे जलस्रोत आटले आहेत. परिणामी, पक्षी व प्राण्यांची भिस्त पाणवठ्यांवर आहे. मात्र, पाणवठेही कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधात माकडे, तरस, रानडुकरे, ससे, मोर व इतर पशुपक्षी मनुष्य वस्तीकडे धावू लागले आहेत.वन विभागाने पाणवठ्यातील जलस्रोत वाढवून तहानलेल्या वन्यजीवांचे जीव वाचवावे. शासन वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता व नियोजनासाठी इतर विभागांपेक्षा वन विभागावर करोडो रुपये खर्च करीत असते. वन्यजीवांना जंगलात मुबलक पाण्याची सोय करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना होते. याही वर्षी ती करण्यात आली; परंतु अभयारण्यातील एक थेंबही नसलेल्या पाणवठ्यांची संख्या पाहाता, वन्यप्रेमींमध्ये या वर्षी झालेल्या प्राणीगणनेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तर, अधिकारी याबाबत माहिती देताना टाळाटाळ करीत आहेत.एकूणच आटलेल्या पाणवठ्यांमधील गाळ काढून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित करणे किंवा कृत्रिमरीत्या पाणवठे पाण्याने भरणे अपेक्षित आहे. यासाठी मात्र वनाधिकाऱ्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.